आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य-चंद्र उपासनेचा दिवस:निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी माघ पौर्णिमेला द्यावे सूर्य-चंद्राला अर्घ्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 फेब्रुवारी, रविवार हा सूर्य आणि चंद्राच्या उपासनेचा दिवसआहे. या दिवशी माघ महिन्याची पौर्णिमा असेल. ग्रंथानुसार दीर्घायुष्य आणि नेहमी निरोगी राहण्यासाठी या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला आणि रात्री चंद्रदेवाला अर्घ्य देण्याची परंपरा आहे.

पुराणात माघी पौर्णिमेला स्नान, दानासह उपवास करणे हे विशेष फलदायी असल्याचे सांगितले आहे. जे लोक गेल्या एक महिन्यापासून दररोज माघ स्नान करत आहेत त्यांचे हे व्रत माघी पौर्णिमेला पूर्ण होईल.

स्नान-दानाचा महान उत्सव
मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशीही तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, माघ पौर्णिमा हा गंगा-यमुनेच्या किनारी संगमावर सुरू असलेल्या कल्पवासाचा शेवटचा दिवस आहे.

या दिवशी संपूर्ण महिन्याच्या तपश्चर्येनंतर शाही स्नानाने कल्प वासाची सांगता होते. त्यामुळे माघ पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. स्नान-दानाच्या सर्व तिथींना महापर्व म्हटले जाते.

या वस्तूंच्या दानाचे विशेष महत्त्व
या उत्सवात यज्ञ, तपश्चर्या आणि दान यांना विशेष महत्त्व असल्याचे डॉ. मिश्र सांगतात. या दिवशी स्नानानंतर भगवान श्रीविष्णूची, पितरांची पूजा करणे आणि गरजूंना दान करण्याचे विशेष फळ प्राप्त होते. अन्न, वस्त्र, तीळ, घोंगडी, गूळ, कापूस, तूप, लाडू, फळे, धान्य, पादुका इत्यादी वस्तू गरजूंना दान कराव्यात.

सूर्य आणि चंद्रपूजेचे विधान
सूर्यपूजा :
माघ मासात केलेल्या सूर्य पूजेने रोग व दोष दूर होतात. म्हणूनच या महिन्याच्या शेवटी सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण केले जाते. उत्तरायणामुळे या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याने वय वाढते आणि रोग दूर होतात. या दिवशी आंघोळीनंतर ऊँ घृनि सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यावे.

चंद्राची पूजा : पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यास पितरांपर्यंत पोहोचते असे शास्त्रात सांगितले आहे. ज्यामुळे पितर तृप्त होतात. माघ महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र आपल्या मित्र सूर्याच्या राशीत असेल. त्यामुळे त्याचा प्रभाव वाढेल. विद्वानांचे म्हणणे आहे की, निरोगी राहण्यासाठी औषधे या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी खावीत. असे केल्याने आजारांपासून आराम मिळू लागतो.

बातम्या आणखी आहेत...