आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार, 26 सप्टेंबरपासून देवी दुर्गाच्या नऊ दिवसीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा करण्यासोबतच जप आणि ध्यान करण्याचीही परंपरा आहे. देवी मंत्रांसोबत करण्यात आलेल्या ध्यानाने भक्ती होते, वाईट विचार नष्ट होतात आणि मनाला शांती मिळते.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, नवरात्रीचा काळ आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. दोन ऋतूंमधील हा काळ आहे. पाऊस संपत असून हिवाळा सुरू होत आहे. शारदीय नवरात्र या दोन ऋतूंमध्ये म्हणजेच संधिच्या काळात येते. जाणून घ्या नवरात्रीशी संबंधित काही खास प्रश्नांची उत्तरे पं शर्मा यांच्याकडून जाणून घ्या...
नवरात्रीत व्रत-उपवास केल्याने काय फायदे होतात?
आता ऋतूंच्या संधीकाळाची वेळ आहे. या दिवसात वातावरण बदलामुळे होणारे आजार होण्याची शक्यता वाढते. इच्छा नसतानाही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. हवामानात झपाट्याने बदल होतो, आपले शरीर त्या झपाट्याने स्वतःशी जुळवून घेऊ शकत नाही आणि सर्दी, खोकला, मानसिक तणाव, वेदना, अपचन, गॅस, ऍसिडिटी अशा समस्या उद्भवू लागतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास आणि ध्यान केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर या आजारांशी लढण्यासाठी तयार होते.
तणावापासून दूर राहण्यासाठी रोज करावे ध्यान
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.