आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला भगवान विष्णूच्या त्रिविक्रम आणि वामन अवतारांची पूजा केली जाते. याला त्रिविक्रम द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने शारीरिक समस्या दूर होतात. यासोबतच कळत-नकळतपणे केलेली पापेही नष्ट होतात. या दिवशी व्रत करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. उपवास म्हणजे अन्न आणि सर्व सुखांचा त्याग करून भगवंताच्या जवळ जाणे.
स्नान आणि दान करणे हे अश्वमेध यज्ञासारखे
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला गंगा आणि यमुनेसह कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. या तिथीला मथुरेतील यमुनेच्या पाण्यात तीळ मिसळून स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा, त्यानंतर पाणी आणि अन्नासोबत तीळ दान केल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य मिळते.
गोमेध यज्ञाचे पुण्य
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला उपवास ठेवून भगवान श्रीविष्णूची पूजा आणि अभिषेक करण्याचा नियम आहे. पूजेत तुळशीची पाने आणि शंखामध्ये दूध-पाणी भरून अभिषेक करावा. असे केल्याने गोमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते.
असे करावे पूजन
ज्येष्ठ महिन्यातील द्वादशीला सूर्योदयापूर्वी तिळाच्या पाण्याने स्नान करून नंतर भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा शास्त्रात सांगितली आहे. या तिथीला स्नान केल्यानंतर पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून सोळा प्रकारच्या वस्तूंनी भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी पंचामृतासह शंखामध्ये दूध आणि पाणी मिसळून देवाला अभिषेक करण्याची विशेष पद्धत सांगितली आहे. यानंतर तुळशीची पाने अर्पण करून आंब्याचा किंवा इतर हंगामी फळांचा नैवेद्य दाखवावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.