आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मन शांतीसाठी आणि विचारांमधील नकारात्मकता दूर राहण्यासाठी रोज सकाळी श्रीरामचरितमानस पाठ करण्याची परंपरा आहे. श्रीराम भक्त या ग्रंथांमधील चौपाईंचा नियमित पाठ करतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि श्रीराम कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या ग्रंथामध्ये मनातील इच्छापूर्तीसाठी वेगवेगळ्या चौपाई सांगण्यात आल्या आहेत.
या चौपाईंचा पाठ करणाऱ्या भक्ताने दररोज सकाळी लवकर उठावे. स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी. श्रीराम, लक्ष्मण, देवी सीता आणि हनुमानसमोर दिवा लावावा. मन एकाग्र करून पूजा करावी. त्यानंतर आपल्या मनातील इच्छेनुसार एक खास चौपाईचा 1 माळ म्हणजे 108 वेळेस जप करावा. जप करण्यासाठी तुळशीच्या माळेचा उपयोग करावा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.