आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिडकीन (औरंगाबाद) येथे झालेल्या ५६ व्या वार्षिक निरंकारी संत समागम सोहळ्याची सांगता झाल्यानंतर कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध झाली. विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ (सांझा हार) घालून करण्यात आला.
त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या शेवटी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी, तसेच विवाहासाठी आलेले नवदाम्पत्यांचे नातलग व उपस्थित भाविकांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.