आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:जिल्ह्यात 6.54 लाख लाभार्थींना‎ मिळणार आयुष्मान भारतचे कार्ड‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना‎ मोफत आरोग्य उपचारासाठी केंद्र‎ सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन‎ आरोग्य योजना २०१८ पासून सुरू केली‎ असून या योजनेतील लाभार्थींना पाच‎ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले‎ जातात. जिल्ह्यात ३५ आरोग्य मित्रांच्या‎ मदतीने या योजनेचे कार्ड जिल्ह्यातील ६‎ लाख ५४ हजार ८७१ लाभार्थींना मोफत‎ दिले जाणार आहेत. हे विशेष शिबिर ५ ते‎ २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात आयाेजित‎ करण्यात आले आहे.‎ जिल्ह्यातील जि. प. गट आणि पंचायत‎ समिती गणांत आयुष्मान भारत आणि‎ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड‎ मोफत देण्यासाठी विशेष मोहीम‎ राबवण्यात येत आहे. सध्या उपलब्ध‎ आरोग्य मित्रांच्या मदतीने लाभार्थींना‎ मोफत कार्ड दिले जाणार आहेत.

जिल्हा‎ परिषद गटात आणि पंचायत समिती‎ गणात हे शिबिर आयोजित करावयाचे‎ त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन‎ आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य‎ योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक‎ गायकवाड यांनी केले आहे.‎ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर आयोजित‎ करण्यात आले आहे.‎ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक‎ या योजनेचा लाभ घेऊ शकतात.‎ ग्रामीण भागात पक्के घर नसलेले,‎ कुटुंबात वयस्क (१६-५९ वर्षे) नसणे,‎ कुटुंबप्रमुख महिला असणे, कुटुंबात‎ कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती -‎ जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती-‎ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र‎ समजले जाते. ग्रामीण परिसरातील बेघर‎ व्यक्ती, निराधार, भीक मागणारे,‎ आदिवासी आदी लोक कोणतीही प्रक्रिया‎ न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ‎ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शहरी‎ भागातील नागरिकांसाठी ही पात्रता‎ शिथिल करण्यात आलेली आहे.‎

कॉम्प्युटर, इंटरनेट सेवा त्याचप्रमाणे‎ शिबिर घेण्यासाठी किंबहुना बसण्यासाठी‎ व्यवस्था करून दिल्यास आरोग्य मित्रांना‎ शिबिर यशस्वीरीत्या घेता येईल.‎ जिल्ह्यात ६ लाख ५४ हजार ८७१‎ लाभार्थी असून त्यात बीड तालुक्यात‎ ६७५८१ लाभार्थी, अंबाजोगाई‎ ५१४३६लाभार्थी, परळी ७०७८६लाभार्थी,‎ माजलगाव ८५६५१ लाभार्थी, पाटोदा‎ ३२४७१ लाभार्थी, गेवराई ७८०७६‎ लाभार्थी, केज ८००४६ लाभार्थी, धारूर‎ ४६०४६ लाभार्थी, शिरूर कासार ४११८१‎ लाभार्थी,वडवणी ३१०२६ लाभार्थी,‎ आष्टी ७०५७१ लाभार्थी आहेत.‎

कोण करू शकतं आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज?‎ आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून‎ अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या‎ व्यक्तीचं नाव एस. इ. सी. सी– २०११ मध्ये असलं पाहिजे. सामाजिक, आर्थिक‎ आणि दुर्बल घटकातील पात्र लाभार्थींची एस. इ. सी. सी– २०११ तयार करण्यात‎ आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य‎ योजनेच्या कार्ड आवश्यक आहे.‎

पाच लाखांपर्यंत योजनेमध्ये होतात मोफत उपचार‎ कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही‎ पद्धतींनी अर्ज करू शकते. या योजनेंतर्गत सरकार लोकांना ''आयुष्मान भारत‎ गोल्डन कार्ड'' प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड द्वारे‎ आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार‎ मोफत मिळवू शकतात.‎ -डॉ. अशोक गायकवाड, जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन‎ आरोग्य योजना‎

बातम्या आणखी आहेत...