आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झाले असून,४ लाख ६१ हजार ३८१ मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी मतदार केंद्रांवर दुपारी मतदार करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. मंगळवारी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे.
सायंकाळी मात्र गर्दी काही प्रमाणात ओसरली होती. दरम्यान, रविवारी लग्नतिथी असताना देखील ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९ नोव्हेंबरला आचारसंहिता जारी झाली होती. शुक्रवारी (१६ डिसेंबर) या निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, त्यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १९५ गावांमध्ये रविवारी मतदान झाले. ग्रामीण स्तरावर गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडत होता.
रविवारी सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेरमध्ये सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. नगर जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतींसाठी ७६६ मतदान केंद्रावर ८० टक्के मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी एकूण ४ लाख ६१ हजार ३८१ मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बहुतांशी मतदार केंद्रावर गर्दी, सायंकाळी मात्र गर्दी ओसरली होती. लग्न तिथी असतानाही ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह दिसून आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.