आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास आवश्यक‎

पारनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक शिक्षण पद्धती‎ दिवसेंदिवस कालबाह्य होत आहे.‎ कौशल्याधिष्ठीत,‎ व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम‎ महाविद्यालयात सुरू करण्यासाठी‎ नव्या केंद्रीय शैक्षणिक धोरणाचा‎ बारकाईने अभ्यास करणे‎ आवश्यक असल्याचे प्रतिपादन‎ जिल्हा मराठा विद्या प्रसारक‎ समाज संस्थेचे अध्यक्ष, माजी‎ आमदार नंदकुमार झावरे यांनी‎ केले. संस्थेने आपल्या विविध‎ महाविद्यालयांमध्ये नव्या राष्ट्रीय‎ शैक्षणिक धोरणात अपेक्षित‎ असलेलेले व्यवसायाभिमुख‎ अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर‎ सुरू केले असल्याचे झावरे‎ म्हणाले.‎

पारनेर महाविद्यालयाच्या‎ पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते‎ बोलत होते. अभिनेते मिलिंद शिंदे‎ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण‎ करण्यात आले. टी. जी.‎ महाविद्यालयाचे (खडकी, पुणे)‎ प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भारत‎ सरकार युवा प्रतिभा पुरस्कार‎ विजेते योगेश चिकटगावकर,‎ प्राचार्य. डॉ. रंगनाथ आहेर,‎ कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष‎ डॉ. संजय गायकवाड, उपप्राचार्य‎ डॉ. दिलीप ठुबे आदी उपस्थित‎ होते.

माजी आमदार झावरे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणाले, इतिहास, भूगोल आदी‎ विषयात प्राप्त केलेल्या पदव्यांचा‎ व्यावहारिक पातळीवर कोणताही‎ उपयोग होत नाही. वाणीज्य‎ शाखेतील पदवीधराला बँकेत खाते‎ उघडण्याचा अर्ज भरता येत नाही.‎ हे पारंपरिक शिक्षण पद्धतीचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अपयश असल्याची खंत झावरे‎ यांनी व्यक्त केली. डॉ. संजय‎ चाकणे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक‎ धोरणात चौकटीबाहेरील‎ शिक्षणाला अधिक महत्त्व आहे.‎

कॉलेज कट्टा ही संकल्पना‎ चांगल्या पद्धतीने राबवायला हवी.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जीवन सुंदर आहे ते आनंदाने जगा.‎ खूप वाचा, लिहा असे आवाहन‎ डॉ. चाकणे यांनी विद्यार्थ्यांना केले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके,‎ कार्यालयीन अधीक्षक सावकार‎ काकडे, प्रा. गंगाराम खोडदे,‎ पर्यवेक्षक प्रा. संजय कोल्हे,‎ विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.‎ दत्तात्रय घुंगार्डे यांच्यासह‎ प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी‎ परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य‎ डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले.‎ उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी‎ आभार मानले. डॉ. हरेश शेळके,‎ डॉ. माया लहारे, प्रा. अशोक शिंदे‎ यांनी सूत्रसंचालन केले.‎ दरम्यान, अभिनेते मिलिंद शिंदे‎ म्हणाले, मुंबई, पुण्याबाहेरचे‎ अभिनेते घडू शकत नाहीत, हा‎ काही लोकांचा भ्रम होता. तो‎ माझ्यासारख्यांनी दिल्ली, पुण्यात‎ अभिनयाचे धडे घेऊन तो गैरसमज‎ दूर केला.‎

बातम्या आणखी आहेत...