आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा‎:पाणीपुरवठा सुरळीत‎ न झाल्यास आंदोलन‎

नगर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग ११ मधील विस्कळीत पाणी‎ पुरवठा तातडीने सुरळीत करावा,‎ अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन‎ करण्यात येईल, असा इशारा‎ नगरसेवक अविनाश घुले यांनी‎ मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे‎ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.‎ निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग‎ क्र.११ मधील कानडे मळा परिसर,‎ चौधरीनगर, चैतन्य कॉलनी,‎ पुनममोती परिसर, कोठी परिसर,‎ झेंडीगेट परिसर, काळू बागवान‎ गल्ली, ख्रिस्त गल्ली, निळकंठ‎ कॉलनी, आशिर्वाद कॉलनी,‎ अरिहंत कॉलनी, हातमपुरा,‎ गंजबाजार, सराफ बाजार परिसर‎ या भागामध्ये गेल्या एक ते दीड‎ महिन्यांपासून पाणी पुरवठा अत्यंत‎ विस्कळीत झालेला आहे.

पाणी‎ पुरवठा वेळेवर होत नाही.‎ केव्हाही पाणी सोडण्यात येते‎ तसेच पाणी पुरवठा अत्यंत कमी‎ दाबाने होत आहे. त्यामुळे बऱ्याच‎ नागरिकांना पाणी मिळत नाही.‎ सध्या उन्हाळ्याचे दिवस असून‎ या भागातील नागरिकांना‎ पाण्याकरिता फिरण्याची वेळ‎ आली आहे. या प्रश्नाबाबत मी‎ वेळोवेळी पाणी पुरवठा‎ विभागप्रमुख व पाणी पुरवठा‎ इंजिनिअर यांची भेट घेऊन या‎ भागातील पाणी पुरवठ्याबाबतच्या‎ समस्या सांगितल्या आहेत. परंतु‎ अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत‎ झालेला नाही. सात दिवसांमध्ये‎ वरील भागामध्ये पाणीपुरवठा‎ सुरळीत न झाल्यास प्रभागातील‎ नागरिकांसमवेत आयुक्तांच्या‎ दालनामध्ये तीव्र स्वरुपाचे ठिय्या‎ आंदोलन करण्यात येईल, असेही‎ अविनाश घुले यांनी निवेदनात‎ म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...