आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभाग ११ मधील विस्कळीत पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अविनाश घुले यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.११ मधील कानडे मळा परिसर, चौधरीनगर, चैतन्य कॉलनी, पुनममोती परिसर, कोठी परिसर, झेंडीगेट परिसर, काळू बागवान गल्ली, ख्रिस्त गल्ली, निळकंठ कॉलनी, आशिर्वाद कॉलनी, अरिहंत कॉलनी, हातमपुरा, गंजबाजार, सराफ बाजार परिसर या भागामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला आहे.
पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. केव्हाही पाणी सोडण्यात येते तसेच पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून या भागातील नागरिकांना पाण्याकरिता फिरण्याची वेळ आली आहे. या प्रश्नाबाबत मी वेळोवेळी पाणी पुरवठा विभागप्रमुख व पाणी पुरवठा इंजिनिअर यांची भेट घेऊन या भागातील पाणी पुरवठ्याबाबतच्या समस्या सांगितल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. सात दिवसांमध्ये वरील भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास प्रभागातील नागरिकांसमवेत आयुक्तांच्या दालनामध्ये तीव्र स्वरुपाचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असेही अविनाश घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.