आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 कर्मचारी कार्यरत‎:इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा बदलली तरी टपाल व्यवस्थेवर ग्राहकांचा िवश्वास‎

रावसाहेब मरकड |शेवगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे युग हे डिजिटल युगात युग‎ आहे. सर्वत्र इंटरनेटचे वर्चस्व आहे.‎ १९९० च्या दशकात आलेल्या या‎ इंटरनेट सेवेमुळे १२० वर्षांपासून सुरू‎ असलेली टपाल व्यवस्था संपुष्टात‎ येईल, असे भाकित केले जात होते.‎ इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा‎ बदलली असली तरी टपाल व्यवस्था‎ मात्र संपलेली नाही. डिजिटल युगात‎ एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी‎ स्थानांतरण काही सेकंदात होते.‎ तरीही आजच्या काळात टपाल‎ खात्याच्या पारंपरिक ‘मनीऑर्डर’ व‎ इतर सेवांचे महत्त्व मात्र अद्याप‎ कायम आहे.‎ एका व्यक्तीकडून दुसऱ्याला पैसे‎ पाठवण्यासाठी पूर्वी टपाल खात्याच्या‎ ‘मनीऑर्डर’चा वापर केला जात‎ होता. मग डिजिटल युग आले.

नेट‎ बँकिंगची सुविधा जवळजवळ सर्व‎ बँकांनी उपलब्ध करून दिली. आधार‎ कार्डला लाभार्थ्यांच्या खात्याशी‎ जोडून सरकारी सहायता योजनांचा‎ निधीही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात‎ जमा होऊ लागला. या कामात‎ पारदर्शकता आली आणि‎ गैरव्यवहाराचे प्रमाणही कमी झाले.‎ आता तर मोबाइल फोनद्वारेही ही‎ सुविधा उलब्ध आहे. पण आजही‎ दुर्गम भागात पत्र पोहोचवणारा‎ पोस्टमन सरकारी योजनांचा लाभही‎ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.‎

शेवगाव टपाल विभागाने‎ खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्पीड‎ पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल सुविधा‎ यात भरारी घेतली आहे. यात १ ते १०‎ वर्षांच्या मुलींसाठी ग्रामीण भागात‎ गावोगावी पोस्टमार्फत सुकन्या‎ योजना राबवली जात आहे. यात २५०‎ रुपयांपासून खाते सुरुवात करता येते.‎ योजनेसाठी जास्तीत जास्त दीड‎ लाखापर्यंत भरना करता येतो.‎ याविषयी पोस्ट खात्यामार्फत‎ जनजागृती करण्याचे काम सुरू‎ आहे.

ग्रामीण भागातही बाल आधार‎ कॅम्प घेण्यात येतात. यामध्ये ० ते ५‎ वयोगटातील बालकांचे आधार कार्ड‎ नोंदणी केली जाते. यासाठी शेवगाव,‎ पाथर्डी, बोधेगाव, बालमटाकळी,‎ मिरी, तिसगाव, खरवंडी, वृद्धेश्वर‎ कारखाना, अशा ८ सब पोस्ट‎ ऑफिस यांच्या अंतर्गत ८९ टपाल‎ कार्यालये आहेत. यामधून सर्व‎ सुविधा दिल्या जातात. यासाठी १३०‎ कर्मचारी कार्यरत आहेत.‎ ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ टक्के‎ व्याजदरांची सुविधा उपलब्ध आहे.‎ आवर्त ठेव ही १०० रुपयांपासून पुढे‎ जास्तीत जास्त ठेवता येते.

यात‎ सेविंग अकाउंटमध्ये एटीएम कार्ड,‎ नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, या‎ सुविधेचा अनेक नागरिक मोठ्या‎ प्रमाणात लाभ घेत आहेत. योजनेला‎ केंद्र सरकार संचार मंत्रालयाच्या‎ वतीने सुरक्षिततेची हमी दिली जाते.‎ भविष्य निर्वाह निधीची योजना सुरू‎ आहे, ३९६ रुपये भरून बँकेमार्फत‎ दहा लाख विमा कवच दिले जाते.‎ यामध्ये सर्पदंश, अपघाती निधन,‎ अपघात यासाठी विमा कवच दिला‎ जातो, अशी माहिती उपविभागीय‎ डाक निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी‎ दिली.‎

बातम्या आणखी आहेत...