आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप‎:कांदा व्यापाऱ्यांच्या हितसंवर्धनाचा प्रयत्न‎

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎कांद्याचे भाव पडले आहेत. शेतकरी‎ उघड्यावर आला आहे. अशा‎ स्थितीत राज्यातील भाजप सरकार‎ मात्र कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन‎ करण्याच्या प्रयत्नात आहे, असा‎ आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत‎ पाटील यांनी शनिवारी केला.‎ दरम्यान, भाजपने शिंदे गटाशी‎ केलेली युती महाराष्ट्राला रुचलेली‎ नाही, त्यामुळे निवडणुका घ्यायला‎ भाजप घाबरत आहे, असा दावाही‎ पाटील यांनी केला.‎ सावता परिषदेने आयोजित‎ केलेल्या माळी समाज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मेळाव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील‎ नगरला आले होते. यावेळी माध्यम‎ प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.‎

यावेळी आमदार संग्राम जगताप‎ उपस्थित होते. पाटील म्हणाले,‎ कांद्याचे भाव पडल्याने, शेतकरी‎ अडचणीत आहेत. राष्ट्रवादीने‎ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या‎ नेतृत्वाखाली विधानसभा सभागृहात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याबाबत आवाज उठवला. त्यावेळी‎ सरकारने थातूर मातूर उत्तर देऊन,‎ समिती नेमण्याचे आश्‍वासन दिले.‎ पण अशी समिती नेमून तिच्या‎ बैठका होईपर्यंत लहान शेतकऱ्याला‎ मिळेल त्या भावात कांदा‎ विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.‎ त्यामुळे कांदा व्यापार्‍यांचे‎ हितसंवर्धन करण्याचे काम भाजप‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सरकार करीत आहे, असा आरोप‎ पाटील यांनी केला.‎ जातनिहाय जनगणना करण्याची‎ ओबीसी समाजबांधवांची मागणी‎ आहे व येथे झालेल्या सावता‎ परिषदेतही तसा ठराव केला गेला‎ आहे. राज्यातील ओबीसी‎ समाजाचीही जात निहाय सर्वेक्षण व‎ जनगणना होण्याची मागणी आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तिची दखल सत्ताधार्‍यांनी घेतली‎ पाहिजे, असेही पाटील यांनी‎ सांगितले.‎

निवडणुकांना‎ भाजप घाबरतोय‎
महाविकास आघाडीमधील तिन्ही‎ पक्षांनी एकत्रित निवडणुका‎ लढवल्या तर मोठे यश व बहुमत या‎ तिनही पक्षांचे होऊ शकेल. पण‎ भाजप स्थानिक स्वराज्य संस्था व‎ अन्य निवडणुका घेण्यास घाबरत‎ आहे. त्यांच्या लक्षात आले आहे‎ की, शिंदे गटा समवेत युती केलेली‎ महाराष्ट्राला रुचलेली नाही,‎ त्यामुळेच निवडणुका पुढे‎ ढकलण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचे‎ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...