आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरातील सावेडी उपनगराचा गेल्या आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बैठका घेऊन अनेक निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे संतप्त झालेल्या सावेडी उपनगरातील महिलांनी शुक्रवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला.
दरम्यान अहमदनगर शहरातील तपोवन व सावेडी रोड परिसरातील भागात अमृत पाणी योजना सुरु करून त्यावर नळ कनेक्शन द्यावे, अशी मागणी यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रशासनाकडे केली. मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली सावेडी उपनगराच्या पाणी प्रश्नासाठी महापालिकेवर महिलांनी हंडा मोर्चा काढला.
यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम, इंजिनियर रोहिदास सातपुते यांनी महिलांचे प्रश्न ऐकून घेतले. विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले, प्रशासनाच्या उदासीनपणामुळे व काम करण्याची इच्छा नसल्यामुळे वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत होऊन कमी दाबाने होतो. सावेडी उपनगरामध्ये रहिवासी, नोकरदार वर्ग असल्यामुळे महिलांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. अक्षरशः नगरसेवकांना नागरिकांच्या वर्षाला सामोरे जावे लागत आहे.
अमृतची पाणी योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार
अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना ३१ मार्च अखेर पूर्ण होईल. त्यावर कनेक्शनसह पाणी पुरवठा करण्यात येईल. प्रभागातील विविध दुरूस्तीची कामासाठीसाहित्य याबाबत संबंधित ठेकेदाराला वेळेवर साहित्य पुरवण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.