आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषद:हिंदुत्ववादाला जाणीवपूर्वक बदनाम‎ करण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे‎

अकोले‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्शांना हरताळ फासून हल्ली‎ दुष्कृत्यांना बळ मिळत आहे. या प्रवृत्ती‎ संपवण्यासाठी हिंदुत्व समजून घेत‎ रामाच्या वृत्तींचा जागर मनामनांत‎ जागवावा. संताच्या मार्गदर्शनानुसार‎ झोपलेल्या समाजाला जागृत करून‎ समाजाचा हरवलेला राष्ट्राभिमान‎ गवसणी देण्याचे काम म्हणजे हिंदुत्व‎ आहे. भारतात हिंदू धर्म व हिंदुत्ववास‎ काही दुष्ट शक्तींकडून जाणीवपूर्वक‎ बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत.‎ आपण ते वेळीच हाणून पाडले नाही तर‎ भविष्यात त्याचे गंभीर परिमाण भोगावे‎ लागतील, असे मत विश्व हिंदू‎ परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर‎ यांनी व्यक्त केले.‎ कोतूळ येथील हिंदू धर्म जागृती‎ सभेस संबोधित करताना गायकर बोलत‎ होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर‎ पिचड होते. व्यासपीठावर महंत‎ भास्करगिरी महाराज, बजरंग दल मुबई‎ क्षेत्राचे मंत्री विवेक कुलकर्णी, देवगिरी‎ येथील विश्व हिंदू परिषदेचे प्रांत‎ धर्माचार्य संपर्कप्रमुख जनार्धन महाराज‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मेटे, बाळासाहेब महाराज कोंढार, माजी‎ आमदार वैभव पिचड उपस्थित होते.‎

महंत भास्करगिरी महाराज यांनी हिंदू‎ धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करीत‎ नाही, पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदू‎ द्वेष करीत आहेत, त्यांना परमेश्वराने‎ सद्बुद्धी द्यावी, असे आवाहन केले.‎ माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले,‎ अकोले तालुक्याला प्राचीन इतिहास‎ आहे. आपल्या पूर्वजांनी दहाव्या‎ शतकापासून जे विचार चालू ठेवले, ते‎ भारतीयांना सशक्त पर्याय देणारे‎ आहेत. चुकीचे विचार सांगणाऱ्यांचा‎ मुकाबला करून आपल्या संस्कृतीचे‎ जतन करण्यासोबत भारत हे महाशक्ती‎ बनावे, यासाठी काम करावे. तर माजी‎ आमदार वैभव पिचड यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भारतीयांच्या मनामनातील हिंदू जागा‎ करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राचा आदर्श‎ आचरणात आणून पूर्वीचेच अखंड‎ हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे, असा‎ आशावाद व्यक्त केला.‎ यावेळी शंकर गायकर यांची विश्व हिंदू‎ परिषदेच्या राष्ट्रीय सहमंत्रीपदी व माजी‎ मंत्री मधुकर पिचड यांना सावित्रीबाई‎ फुले पुणे विधापीठाकडून जीवन‎ साधना गौरवाने पुरस्कारीत केल्याबद्दल‎ महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते‎ विशेष सन्मानित करण्यात आले.‎ प्रारंभी कोतूळ गावातून महंत‎ भास्करगिरी महाराज यांच्या‎ मार्गदर्शनातून भव्य शोभा यात्रा‎ काढली.

महिला व नागरिकांनी‎ शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्वागत केले. प्रास्ताविक प्रदीप भाटे‎ यांनी केले.‎ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी‎ विजय पवार, किशोर आरोटे, रोहित‎ चोथवे, मयूर आरोटे, विशाल बोऱ्हाडे,‎ मनोज लोखंडे, प्रसाद जंगम, जय‎ बोऱ्हाडे, महेश पोखरकर, गणेश‎ पोखरकर, आदींनी प्रयत्न केले.‎ यावेळी विहिपचे नवी मंबई जिल्हा मंत्री‎ लालचंद मलिक, कुलाबा जिल्हा‎ सहमंत्री सतीश देशमुख, पुणे जिल्हा‎ मंत्री संतोष खामकर, नगर जिल्हा‎ सहमंत्री विशाल वाकचौरे यांच्यासह‎ भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस‎ नितीन दिनकर, अमृतसागर दूध संघाचे‎ उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, उपस्थित‎ होते.‎

त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी‎
हिंदू धर्म हा कोणत्याही इतर धर्माचा द्वेष‎ करीत नाही. पण काही लोक‎ जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा द्वेष करीत‎ आहेत. त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी‎ द्यावी, असे आवाहन महंत भास्करगिरी‎ महाराज यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...