आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक:सहकारातून रोजगार निर्मितीला चालना‎ देण्यासाठी औजारे बँक सुरू करणार‎

शिर्डी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारी साखर कारखानदारीच्या‎ स्थैर्यासाठी उसाचे उत्पादन वाढवणे‎ गरजेचे आहे. यासाठी ऊस‎ उत्पादकांसाठी अमृत कलश योजनेची‎ सुरुवात करण्यात आली. सहकारातून‎ रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी‎ औजारे बँक सुरू करण्यात येणार‎ आहे, अशी माहिती महसूलमंत्री‎ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.‎ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील‎ सहकारी साखर कारखान्यातर्फे‎ प्रवरानगर येथे आयोजित ऊस पिक‎ परिसंवादात मंत्री विखे बोलत होते.‎ ऊस तज्ञ कृषिरत्न डॉ. संजीव माने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून‎ उपस्थित होते.

माजी मंत्री अण्णासाहेब‎ म्हस्के, नंदुशेठ राठी, कारखान्याचे‎ उपाध्यक्ष विश्वासराव कडू, सुधाकर‎ बोराने आदी उपस्थित होते.‎ मंत्री विखे म्हणाले, स्वातंत्र्याचा‎ अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऊस‎ उत्पादन वाढीसाठी अमृत कलश‎ योजनेतून एकरी उस उत्पादन‎ वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यासाठी कारखाना आणि ऊस‎ उत्पादकांनी एकत्र काम करावे.‎ ऊसाचे उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा‎ वापर होण्याची गरज आहे.

शासनाने‎ ठिंबकसाठी आता ८० टक्के अनुदान‎ देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमध्ये‎ यांत्रिकिकरणावर भर देत असतानाच‎ ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासह‎ कारखान्यामार्फत औजारे बँक सुरू‎ करण्यात येईल. यातून तरुणांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रोजगार मिळेल.‎ डॉ. संजीव माने यांनी ऊस‎ पिकांसाठी जमीन, मशागत, लागवड‎ तंत्र लागवड अंतर, बेणे निवड, खत‎ व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय‎ कर्ब वाढीसाठी सेंद्रीय खताचा वापर‎ याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात‎ उपाध्यक्ष विश्वास कडू यांनी‎ उत्पादनवाढीसाठी आयोजित विविध‎ योजनांची माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...