आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीय बैठक:काँग्रेसला अनुकूल वातावरण, संघटन वाढवा‎; बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | संगमनेर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचा विचार शाश्वत आहे.‎ जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला‎ असल्याने सर्व सेलच्या‎ पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्ती‎ करा. आगामी निवडणुकांमध्ये‎ काँग्रेसला अनुकूल वातावरण‎ असल्याने तरुणांना सक्रिय करत‎ संघटन वाढवा. असे आवाहन काँग्रेस‎ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी‎ केले.‎ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात‎ साखर कारखाना अतिथी गृहावर‎ शनिवारी जिल्हा काँग्रेस‎ पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत‎ आमदार थोरात बोलत होते.

आमदार‎ लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र‎ नागवडे, मधुकर नवले, उत्कर्षा‎ रुपवते, डॉ. एकनाथ गोंदकर, युवक‎ काँग्रेसचे स्मितल वाबळे, ज्ञानदेव‎ वाफरे, मिलिंद कानवडे, दादा‎ वाकचौरे, आकाश नागरे, सोमेश्वर‎ दिवटे उपस्थित होते.‎ आमदार थोरात म्हणाले,‎‎ जिल्ह्यात बाजार समितीमध्ये‎ काँग्रेसला चांगले यश मिळाले.‎ आगामी सर्व निवडणुका पूर्ण‎ ताकतीने लढवायच्या असल्याने‎ कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे.‎ भाजपने केलेल्या चुकांमुळे जनतेत‎ नाराजी आहे. ती सर्वसामान्यांपर्यंत‎ पोहोचवा. जिल्ह्यात कार्यकर्त्यांची‎ संख्या मोठी आहे. त्यांना सक्रिय‎‎ करा. मंडल पातळीवर विविध‎ सेलच्या नियुक्ती करून नवीन‎ चेहऱ्यांना संधी द्या. त्यांना‎ जबाबदाऱ्या द्या. समाज माध्यमातून‎ काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत‎ पोहोचवा. माणसे जोडण्याचा‎ काँग्रेसचा विचार आपले भांडवल‎ असल्याने एकजुटीने काम करा.‎ कर्नाटकच्या निकालाने काँग्रेसच्या‎ ‎विजयाची सुरुवात झाल्याचे त्यांनी‎ सांगितले. आमदार कानडे म्हणाले,‎ देशात महागाई, भ्रष्टाचार वाढला‎ आहे. शेतकरी आसमानी संकटात‎ सापडला आहे. भाजप जनतेच्या‎ भावनेशी खेळत असल्याने राज्यात‎ कोणत्याही क्षणी निवडणुका‎ लागतील, यासाठी कार्यकर्त्यांनी‎ सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी‎ केले. नागवडे म्हणाले, आमदार‎ बाळासाहेब थोरात यांच्या‎ नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जिल्ह्यात‎ अधिक भक्कम होईल, यासाठी‎ कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियतीने‎ काम करावे. यावेळी डॉ. एकनाथ‎ गोंदकर, उत्कर्षा रुपवते, मधुकर‎ नवले, स्मितल वाबळे, ज्ञानदेव‎ वाफारे यांची भाषणे झाली.‎

समाज माध्यमांचा प्रभावी वापर करा‎

२०१४ मध्ये भाजपने समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत सत्ता मिळवली.‎ काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकशाही व देश विकासाचा विचार प्रत्येकापर्यंत‎ पोहोचवण्यासाठी समाज माध्यम सर्व प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करावा,‎ अशा सूचना आमदार बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.