आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य‎ कानिफनाथांची आजपासून यात्रा‎

नगर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य‎ कानिफनाथांची यात्रेस सोमवारपासून (६‎ मार्च) सुरू होत आहे. १५ दिवस‎ चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून‎ मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात.‎ दोन वर्षांच्या कालखंडानंतर यात्रा होणार‎ असल्याने विक्रमी गर्दी होण्याची शक्यता‎ देवस्थान समितीने व्यक्त केली आहे.‎ होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची‎ यात्रा भरते. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध‎ घाल्या यात्रा कमी प्रमाणात भरली होती .‎ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या‎ लक्षणीय असण्याची शक्यता आहे.‎ पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास‎ चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर पाहणी‎ करून पोलिस विभागाकडून वाहनतळ‎ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात‎ येत आहे.

यात्रेनिमित्त पुणे, नगर, पाथर्डी,‎ कंरजी, तिसगाव, शेवगाव, सोलापूर,‎ पंढरपूर, औरंगाबाद येथून विविध हॉटेल‎ व्यावसायिक दाखल झाले आहेत .‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने,‎ प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही‎ सुरुवात झाली आहे.‎ मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन‎ मरकड, सचिव विमल मरकड‎ ग्रामपंचायतीच्यावतीन े सरपंच संजय‎ मरकड, उपसरपंच रवींद्र अारोळे,‎ ग्रामसेवक विठ्ठल राजळे आदी यात्रेसाठी‎ परिश्रम घेत आहेत.

देवस्थान समितीने‎ १८ ते २१ मार्च दरम्यान गुढी पाडव्यापूर्वी‎ चार दिवस अगोदर कानिफनाथांचे‎ समाधीमंदिर दर्शनाला खुले ठेवून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समाधी मंदिरात भाविकांना थेट प्रवेश‎ मिळणार आहे.‎ दरम्यान, नियोजन बैठकीत‎ ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून‎ रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत . जे‎ बुजवले ते मातीने बुजवल्याने माती‎ टाकलेले खड्डे पुन्हा उघडे पडत‎ असल्याने तत्काळ हे काम थांबवून‎ डांबर-खडीने पॅचवर्कचे काम करावे,‎ अशी मागणी होत आहे. तिसगाव मढी‎ नवीन झालेल्या दिड किमी रस्ताच्या‎ साईट पट्ट्या पूर्णपणे भरल्या नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...