आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा मेळावा‎:चिखली येथे 26 वर्षांनंतर भेटले बालमित्र‎

संगमनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन माध्यमिक विद्यालय चिखली‎ येथील १९९७ च्या एसएससी‎ बॅचमधील विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर‎ हॉटेल परिवार गार्डन येथे उत्साहात‎ पार पडले.‎ चिखली येथील संजय बिडवे,‎ मनोज हासे तसेच अलका हासे‎ यांनी दहावी मध्ये शिकत असलेल्या‎ विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक‎ मिळवून व्हाॅट्सअप ग्रुप तयार केला‎ व सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन‎ केले.

त्याप्रमाणे २४- २५ जणांचा ग्रुप‎ तयार झाला. या सर्व जणांचा स्नेह‎ मेळावा हॉटेल परिवार गार्डन‎ मंगळापुर फाटा येथे उत्साहात पार‎ पडला.‎ तब्बल २६ ते २७ वर्षानंतर या‎ मित्रांच्या व मैत्रिणींच्या भेटी‎ झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद‎ झळकत होता. प्रत्येक जण आपले‎ सुखदुःख एकमेकांशी गप्पांच्या‎ रूपाने वाटताना दिसत होते. या‎ विद्यार्थ्यांमध्ये काही इंजिनिअर, लँड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ डेव्हलपर, मॅनेजर, शिक्षक,‎ प्रगतशील शेतकरी तर काही उत्कृष्ट‎ व्यवसायिक होऊन आपले भविष्य‎ अजमावत आहेत.‎ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात‎ इयत्ता दहावी नंतरच्या स्वतःच्या‎ आयुष्यात घडलेल्या अनेक‎ प्रसंगांवर आपले अनुभव कथन‎ केले.

१९९७ साली नूतन माध्यमिक‎ विद्यालय चिखली येथे कार्यरत‎ असलेले शिक्षक कै. वाळूंज सर,‎ आहेर मॅडम, भालेराव सर,‎ सदाफळ सर, हासे सर यांच्याविषयी‎ सर्वांनीच कृतज्ञता व्यक्त केली व‎ पुढील वेळी विद्यालयात अशाच‎ प्रकारचा गेट-टुगेदर ठेवून‎ विद्यालयास भौतिक स्वरूपातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मदत देण्याविषयीची भावना व्यक्त‎ केली. याप्रसंगी निलेश देशमुख,‎ मनोज हासे, संजय बिडवे, सोमनाथ‎ कवडे, विकास कवडे. भारत केरे,‎ नारायण हासे, विजय नवले, दिलीप‎ दिघे, नितीन सिनारे, दत्तू नवले,‎ सोमनाथ हासे, रमेश सहाणे ,‎ भाऊसाहेब देशमुख. सोन्याबापु‎ सिनारे, अलका हासे, निर्मला‎ हासे, संगीता पावसे,मनिषा मेमाणे‎ ,योगिता मेमाणे, उषा म्हस्के,‎ शालिनी कानवडे आदी माजी‎ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित‎ होत्या. प्रास्ताविक संजय बिडवे‎ यांनी, सूत्रसंचालन मनोज हासे‎ यांनी, तर आभार सोन्याबापू सिनारे‎ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...