आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहविचार सभा:बालभारतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचा‎ मुलांना त्यांच्या जीवनात उपयोग व्हावा‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम‎ पुस्तकातच न राहता, मुलांच्या जीवनात‎ त्याचा उपयोग व्हावा. यासाठी‎ प्रात्यक्षिकांद्वारे जिल्ह्यातील सर्व‎ शाळांमध्ये प्रशिक्षण वर्ग राबवण्यात यावे.‎ महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलिस) व‎ शिक्षण विभागाचे अधिकारातंर्गत प्रत्येक‎ शाळेतील किमान एका शिक्षकांनी‎ आरएसपी चे प्रशिक्षण करण्याचे‎ आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी‎ अशोक कडूस यांनी केले.‎

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व‎ नागरी संरक्षण संघटन (नागपूर)‎ अहमदनगर विभाग ची (आर.एस.पी.‎ अण्ड सी.डी.) सहविचार सभा‎ शहरातील पेमराज सारडा‎ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.‎ यावेळी मार्गदर्शन करताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिक्षणाधिकारी कडूस बोलत होते.‎ उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार‎ वाहन निरीक्षक राहुल सरोदे यांच्या‎ अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी‎ शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप‎ निरीक्षक ए.बी. शिरसाठ, विभागीय‎ आर.एस.पी. डिव्हिजनल कमांडर‎ सिकंदर शेख, जिल्हा परिषदेचे विस्तार‎ अधिकारी लाळगे, जिल्हा समादेशक‎ सोमनाथ बोंतले प्रमुख पाहुणे म्हणून‎ उपस्थित होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

शिक्षणाधिकारी कडूस यांनी‎ आर.एस.पी. विषय शाळेत शालेय‎ विद्यार्थी पर्यंत मर्यादित न राहता,‎ ग्रामसभेतून सामान्य नागरिकांपर्यंत‎ पोहचविणे काळाची गरज असल्याचेही‎ सांगितले. जिल्हा समादेशक सोमनाथ‎ बोंतले यांनी पाहुण्यांची ओळख व‎ स्वागत करून नोंदणी आणि शाळेतील‎ उपक्रम विषयावर माहिती दिली. तर सर्व‎ ग्रेड विषयांकरीता बालभारतीचेच पुस्तके‎ वापरण्याचे आवाहन केले.

सिकंदर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेख म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू‎ समजून भविष्याचा वेध घेऊन‎ विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा व नागरी‎ संरक्षणाच्या माध्यमातून विषयाचे गांभीर्य‎ ओळखून, भावी काळामध्ये होणारे रस्ते‎ अपघाताचे प्रमाण कशाप्रकारे कमी‎ होईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले.‎ मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे‎ यांनी वॉक ऑन राईट उपक्रमाबद्दल‎ मार्गदर्शन करून, आर.एस.पी.‎ शिक्षक-पोलीस व परिवहन विभागांनी‎ एकत्रितपणे नियोजनातून उपक्रम‎ राबविल्यास अपघाताच्या प्रमाणात घट‎ होण्यास निश्‍चित मदत होणार‎ असल्याचे सांगितले. यावेळी संगमनेर‎ पंचायत समितितील जनसंपर्क‎ अधिकारी बाबासाहेब मेमाणे यांनी‎ आर.एस.पी. अधिकारी शिक्षकांनी‎ कोरोना काळात केलेल्या कामाचे‎ कौतुक केले.‎

उपप्राचार्या भोसले मॅडम उपस्थित‎ होत्या. सहाएक पोलिस निरीक्षक ए. बी.‎ शिरसाठ यांनी शालेय विद्यार्थ्यांना‎ वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिले तर‎ ते घरोघरी सर्व पालकांपर्यंत पोहोचू‎ शकणार असल्याचे स्पष्ट केले.‎ उपस्थित जिल्ह्यातील शिक्षकांनी मे‎ महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत‎ आर.एस.पी. चे प्रशिक्षण अहमदनगर‎ जिल्ह्यातच घेण्याची मागणी केली.‎ यावेळी सर्व तालुका समादेशक व‎ जिल्ह्यातील आर.एस.पी. प्रशिक्षित व‎ अप्रशिक्षित शिक्षक उपस्थित होते.‎ रामदास कासार यांनी सूत्रसंचालन केले.‎ सुरेश डूबे यांनी आभार मानले.‎

या गोष्टींचे‎ प्रशिक्षण...‎ विद्यार्थी जीवनात वाहतूक सुरक्षेचे‎ महत्त्व, आपत्ती व्यवस्थापन,‎ फायर फायटिंग, अग्निशमन,‎ प्रथमोपचार, कॅरिंग मेथड, परेड,‎ शिस्त, प्रशिक्षणाचे कार्य‎ आर.एस.पी. अ‍ॅण्ड सी.डी.‎ संघटना कार्य करत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...