आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार बबनराव पाचपुते यांना संपवण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे, असा आरोप काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत केला.काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांचा पाचपुते यांचा पुतण्या साजन यांनी पराभव केल्यानंतर आमदार पाचपुते गटाला दहा सदस्यांचे बहुमत असतानाही उपसरपंच निवडीत त्यांच्या गटाला एक मत फुटल्याने झालेला पराभव जिव्हारी लागला. यामुळे त्यांच्या गटातील निवडून आलेल्या दहा सदस्यांनी राजीनामे सरपंच पाचपुते यांच्याकडे दिले. या पार्श्वभूमीवर बोलताना सरपंच पाचपुते म्हणाले, राजीनामे देण्या अगोदर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय गरजेचे होते.परंतु त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता आ. पाचपुते यांच्या दोन नंबर फळीतील कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून निर्णय घेतला.
या राजीनामा नाट्यामुळे आमदार पाचपुते यांचा अथवा त्यांच्या घरातील कोणाचाही संबंध नाही. आमदार पाचपुते यांचे राजकारण संपवण्यासाठी त्यांच्या जवळच्या लोकांनी या दहा सदस्यांना राजीनाम्याचे पाऊल उचलायला भाग पाडले आहे. राजीनामे द्यायचे असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे मी त्यांचे राजीनामे मंजूर करतो. राजीनाम्याचा देखावा कशासाठी. दोन दिवसात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. v
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.