आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नगरच्या कायदा व सुव्यवस्थेप्रश्नी‎ आमदारांची गृहमंत्र्यांकडे तक्रार‎

नगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणतः‎ खून, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली‎ होत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा‎ प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसाढवळ्या‎ चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंगसारखे‎ प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये‎ असुरक्षिततेचे वातावरण आहे. पोलिस‎ यंत्रणेचा गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही.‎ वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष‎ झाल्याची तक्रार आमदार संग्राम जगताप‎ यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या‎ सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने‎ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही‎ त्यांनी केली आहे.

‎ नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण‎ असल्याने येथे मोठी बाजारपेठ आहे.‎ जिल्ह्यातून ग्राहक येथे खरेदीसाठी येतात.‎ शहरात वारंवार गैरप्रकार होत असल्यामुळे‎ जातीय तणाव निर्माण होतो. त्याचा परिणाम‎ थेट बाजारपेठ तसेच व्यापारी वर्गावर होतो.‎ त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वातावरण निर्माण होते. आठ ते दहा दिवस‎ बाजारपेठ बंद ठेवावी लागते. सर्व व्यवहार‎ ठप्प होतात. राज्यभर शहराची बदनामी‎ होते. याची दखल घेऊन नगर शहरासह‎ जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित‎ रहावी, यासाठी उपाययोजना कराव्यात,‎ असे निवेदनात म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...