आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागरिकांनी जनता दरबारात दिलेल्या तक्रारींचे निवारण प्रशासकीय यंत्रणांनी १५ दिवसांत करण्याचे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी (६ मार्च) दिले. मंत्री विखे यांनी राहुरी व राहाता येथे जनतेच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे आदी या वेळी उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय विखे यांनीही जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.