आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष‎:जलजीवन च्या कामात निकष धाब्यावर‎

नगर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत‎ ८२९ योजनांच्या कामांना कार्यारंभ‎ आदेश देण्यात आले आहेत. या‎ योजनेतील कामे निकषानुसार होत‎ नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे‎ येत आहेत. तथापि, ग्रामीण‎ पाणीपुरवठा विभाग त्याकडे दुर्लक्ष‎ करत असल्याने योजनेंच्या कामांच्या‎ दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले‎ आहे.‎ जलसंकटावर मात करण्यासाठी १‎ हजार ३१३ कोटींचे जलजीवन मिशन‎ जिल्हाभर रावले जात आहे. जिलाया‎ यापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र‎ पाणीपुरवठा योजना तसेच प्रादेशिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणी योजना प्रतिव्यक्ती ४० लिटर‎ निकष ठेऊन आखण्यात आल्या‎ होत्या. आता जलजीवन मिशनअंतर्गत‎ जुन्या योजनांची पुनर्बांधणी करताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा‎ निकष ठेवला आहे.

जिल्ह्यातील ९३१‎ गावांत ८२९ योजनांच्या माध्यमातून‎ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा‎ करण्यात येणार आहे. या योजनांना‎ कार्यारंभ आदेश दिले आहेत. योजना‎ करताना निकष ठरवून दिले आहेत.‎ तथापि, निकषांची परवा न करता कामे‎ घाईत उरकून घेण्याचा प्रकार सुरू‎ आहे. तशा तक्रारी जिल्हा परिषदेला‎ प्राप्त होत आहेत. नगर तालुक्यातील‎ भोरवाडी योजनेसाठी सुमारे १ कोटी ९९‎ लाखांचा खर्च येणार आहे. योजनेचे‎ काम सुरू असून, अनेक ठिकाणी एक‎ मिटर खोदाई झाली नाही, तसेच‎ प्लास्टिकचे पाईपचे अच्छादन‎ करताना, पाईपखाली माती टाकण्यात‎ आली नाही. या कामांच्या चौकशीची‎ मागणी योगेश पानसरे यांनी केली‎ आहे. निकषांच्या‎ अंमलबजावणीबाबत प्रशासन गंभीर‎ नसल्याने भविष्यात दुबार खर्च‎ करण्याची नामुष्की ओढावण्याची‎ धास्ती आहे. अशा इतरही तक्रारी‎ जिल्हा परिषदेत दाखल होत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...