आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा तडाखा:151 गावांतील 4400 हेक्टरवर पिकांचे नुकसान‎

नगर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी व वादळी पावसाने रब्बीच्या पिकांवर‎ अवकळा आणली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या दोन‎ दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी,‎ हरभरा पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान‎ झाले आहे. सरकारी स्तरावरून पंचनाम्याच्या आदेशाची‎ प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील १५१ गावांमधील ४‎ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा‎ प्राथमिक अंदाज आहे.‎ नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी‎ (ता. ६) रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी‎ वाऱ्यासह पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्रीही बहुतांश‎ भागात पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी पहाटे व‎ दिवसभर कमी-जास्त प्रमाणात जिल्ह्यात अवकाळी‎ पाऊस झाला. जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांमध्ये‎ अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले‎ आहे.

प्रामुख्याने नगर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक‎ पाऊस झाल्याने गहू, हरभरा, कांदा या नगदी पिकांचे क्षेत्र‎ वाढले होते. रब्बी हंगामात पिकांचे क्षेत्र वाढले असताना,‎ अवकाळी पावसाने या पिकांवर अवकळा आणली आहे.‎ ग्रामीण भागात काढणीला आलेल्या गव्हावर अवकाळी‎ पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात‎ हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक झोपले आहे. हरभरा,‎ ज्वारी, कांदा पिकांचीही तीच अवस्था आहे. पालेभाज्या‎ व फळबागांचेही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.‎

पंचनामे करण्याचे‎ आदेश द्यावेत‎
अवकाळी पावसामुळेशेतकर ी वर्ग‎ अडचणीत आला आहे. त्याकडे‎ लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने‎ मंत्री व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष‎ देऊन पंचनामे करण्याचे आदेश‎ द्यावेत. शेतकऱ्यांना दिलासा दिला‎ पाहिजे, मात्र सरकार गांभीर्याने घेत‎ नसल्याची टीका विरोधी पक्षनेते‎ अजित पवार यांनी मंगळवारी‎ पत्रकारांशी बोलताना केली.‎

प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश
नगर जिल्ह्यात ७ ते ९ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व‎ गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा‎ प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मेघगर्जनेच्या वेळी‎ विजा चमकत असताना, वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी‎ झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, असे आवाहन‎ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.‎

प्राथमिक पाहणीनंतरच पंचनामे‎
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले‎ आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या‎ पिकांच्या प्राथमिक पाहणीनंतर पंचनामे करण्यात येतील.‎ त्यासाठी सर्वे करण्याचे निर्देश सर्व तहसील यंत्रणेला दिले‎ आहेत.‎ सिद्धाराम साळीमठ, जिल्हाधिकारी.‎

सर्वेनंतर नुकसान स्पष्ट होईल‎
अवकाळी व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे‎ जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले‎ आहे. प्राथमिक टप्प्यात नुकसानीचे सर्वे करण्याचे काम‎ सुरू असून, सर्वेक्षणानंतरच किती हेक्टरवरील पिकांचे‎ नुकसान झालेय, त्याचा अंतिम अहवाल येईल.‎

बातम्या आणखी आहेत...