आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कर्मचारी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप केला, त्यानंतर २५ जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
आता पुढच्या टप्प्यात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेने ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. या वेळी प्रशांत साबळे, दीपक मेटे, गणेश गुंड, समीर शेख, अविनाश परळकर, नीलेश तनपुरे, सतीश दिघे, राहुल भोसले, अक्षय नवले, राजश्री पाटील, इंद्रायणी भारुडे, किरण करपे, किशोर साळवे, संतोष शिंदे, नितीन हजारे, बाळासाहेब शिंगाडे, प्रियांका चौधरी, अक्षय दुधाळ, अतुल बनसोड, विशाल पांढरे आदी उपस्थित होते.
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर-२०१९ मधील मानधन वाढीतील प्रलंबित फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी आदी मागण्या केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.