आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकाला दांडके, दगडाने मारहाण करत कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खलील यासीन सय्यद (वय ४५, रा. चौपाटी कारंजा) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.
बुधवारी सकाळी चौपाटी कारंजा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी त्याची पत्नी रेश्मा खलील सय्यद (वय ३५) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वसीम फारूख शेख, युसुफ फारूख शेख, कुदुस शेख, रेशम वसीम शेख, यासमिन युसुफ शेख, आशा फारूख शेख (सर्व रा. चौपटी कारंजा) व आक्रम शेख (रा. मुकुंदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खलील सय्यद यांच्या शेजारी वसीम शेख यांचे कुटुंब राहते. खलील यांना जाण्या-येण्यासाठी वसीम यांच्या घरासमोरून रस्ता आहे. वसीमची पत्नी रेशम त्या रस्त्यावर धुणीभांडी करत असते. त्यावरून त्यांच्यात यापूर्वी वाद झालेले आहे. खलील हे वसीम यांच्या विद्युत मोटारीने पाणी भरतात. त्यासाठी ते प्रतिमहा १५० रुपये देतात. बुधवारी पाणी आल्यानंतर वसीमने नळाला मोटार जोडली. साडेनऊ वाजेच्या सुमारास ती मोटार काढून घेतली. खलील म्हणाले, ‘आम्ही मोटारीचे पैसे देतो, आम्हाला पाणी भरू द्या’, असे म्हणताच रेशमा, आशा, यासमिन यांनी खलील यांना शिवीगाळ केली. व खलील यांना सात जणांनी लाकडी दांडके, दगड, फर्शीने मारहाण केली. वसीम शेख याने खलीलवर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.