आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी व बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. शासनाने कॉपीमुक्त अभियान हाती घेतले आहे. तथापि, जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फलक हाती घेऊन कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या जागृतीसाठी गावातून फेरी काढली. परीक्षेत कोणीही कॉपी करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पथकांची नेमणूक केली आहे.
ही पथके पेपर सुरू होण्यापूर्वी विविध केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांची झडती घेतात. तसेच पेपर सुरू झाल्यानंतर जर कोणी कॉपी करताना आढळून आल्यास कारवाई करत आहेत. प्रशासनाने मोठा गाजावाजा करून कॉपी मुक्त अभियानाची घोषणा केली होती. परंतु, बारावीच्या पहिल्याच पेपरला पाथर्डी केंद्रात विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विद्यार्थ्यांमध्ये कॉपीमुक्तीचा जागर करण्यात प्रशासनाला फारसे यश आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.