आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा व्यवस्थापन:जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कचरा‎ उचलण्यासाठी धावणार ई-वाहने

दीपक कांबळे |नगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत ग्रामस्तरावर‎ घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.‎ परंतु, बहुतांश ग्रामपंचायतींकडे प्रकल्पांपर्यंत कचरा‎ वाहतुकीची व्यवस्थाच नाही. यापार्श्वभूमीवर जिल्हा‎ परिषदेने चौदाव्या वित्त योगाचार्या शल्लक निधीतून ४‎ कोटी ८१ लाखांच्या १६० ईलेक्ट्रिक कचरा वाहतूक‎ गाड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी‎ जिल्हा परिषद स्तरावरून निविदा मागवण्यात आल्या‎ आहेत.‎ अहमदनगर जिल्हा २०१८ मध्येच हगणदारीमुक्त झाला‎ असल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी अजूनही‎ ग्रामीण भागात शौचालयांची १०० टक्के अंमलबजावणी‎ झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात‎ घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुमारे ५३६ कामे ‎ ‎ करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे ४५० कामांना प्रशाकीय ‎ ‎ मान्यता देण्यात आल्या आहेत. काही भागात प्रकल्प‎ उभारणी सुरू झाली असली तरी गती मिळाली नाही.‎

अशा स्थितीत प्रशासक मुख्यकार्यकारी अधिकारी‎ आशिष येरेकर यांनी महिनाभरात तालुकास्तरावर‎ घेतलेल्या बैठकांत ईलेक्ट्रिक कचरा वाहतूक करणारी‎ वाहने खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत.‎ ग्रामपंचायतींकडून पंधराव्या वित्त आयोगातून अशी‎ वाहने खरेदीसाठी कामबदलाचे प्रस्ताव जिल्हा‎ परिषदेकडे पाठवण्यात येत आहेत. आता जिल्हा‎ परिषदेनेच १६० इलेक्ट्रिक वाहने खरेदीचा निर्णय‎ घेतल्याने पुढील दोन महिन्यात ग्रामीण रस्त्यांवर अशी‎ वाहने कचरा संकलन व वाहतूक करताना दिसून येतील.‎

गाड्या वाटपाचा‎ मुद्दा कळीचा‎
जिल्हा परिषद खरेदी केलेली वाहने‎ ग्रामपंचायतींना वाटप करणार आहे,‎ परंतु ग्रामपंचायतींची संख्या १ हजार‎ ३१९ आहे. त्यामुळे मागणी‎ वाढल्यास खरेदी केलेल्या १६०‎ गाड्या कोणत्या ग्रामपंचायतींना‎ द्यायच्या असा पेच निर्माण झाला‎ आहे. आगामी निवडणुकांच्या‎ पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेप‎ वाढल्यास वाटपाचा मुद्दा कळीचा‎ ठरणार आहे.‎

सीईओ येरेकर यांच्याशी‎ चर्चा करणार‎
कचरा वाहतुकीसाठी नव्याने १६०‎ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात‎ येणार आहेत. ही वाहने खरेदीनंतर‎ ग्रामपंचायतींना वाटप करायची आहेत.‎ वाटपाचा निकष ठरवावा लागणार‎ आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी‎ अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी‎ चर्चा करून वाटपाचा निकष ठरवणार‎ आहोत. एस. एस. शिंदे, उपमुख्य‎ कार्यकारी अधिकारी.‎

अशी असेल ३ चाकी‎ इलेक्ट्रिक गाडी‎
कचरा वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक‎ गाडीची क्षमता किमान ३०० किलो तर‎ एका चार्जींगमध्ये किमान ४०‎ किलोमिटर धावू शकेल, अशी वाहने‎ खरेदी करण्याचे नियोजन आहे. विशेष‎ म्हणजे ही वाहने तीन चाकी असणार‎ आहेत, अशी प्राथमिक माहिती जि.प.‎ प्रशासनाकडून समजली. या वाहनाचा‎ फायदा माझी वसुंधरा अभियानातही‎ होणार आहे.‎

निकष ठरवावा लागेल
‎ई-कचरा गाड्या खरेदीसाठी‎ निविदा मागवण्यात आल्या आहेत,‎ महिनाभरात गाड्या खरेदीची‎ प्रक्रिया होऊ शकते. तत्पूर्वी खरेदी‎ केलेल्या कचरागाड्या वाटपाचा‎ निकष निश्चित करावा लागणार‎ आहे. याबाबत मुख्य कार्यकारी‎ अधिकारी आशीष येरेकर निर्णय‎ घेणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत‎ विभागप्रमुखांसमवेत बैठकीत‎ निर्णय होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...