आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे बिग स्टोरी:दररोज तब्बल 1 लाख 50 हजार पाणी‎ बाटल्यांवर भागवताहेत नगरकर तहान‎

बंडू पवार | नगर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक जाणिवेतून २० वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख‎ चौकाचौकांत उन्हाळ्याला प्रारंभ होताच सुरू होत असलेल्या‎ पाणपोई आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाणपोईंची‎ जागा आता प्लास्टिकच्या बाटली बंद पाण्याने घेतली आहे.‎ कोरोनानंतर आरोग्याप्रती वाढलेल्या जागरूकतेमुळे हॉटेल,‎ लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात बंद पाण्याच्या‎ बाटल्याचा वापर होत आहे. नगर शहरात दररोज १ लाख ५०‎ हजार पाण्याच्या बाटल्याची विक्री होते, हीच विक्री मे महिन्यात‎ उष्णतेची तीव्रता वाढल्यानंतर प्रतिदिन पाच लाखांवर जाणार‎ आहे. बाटलीबंद पाणी विक्रीतून महिन्याला जवळपास २९०‎ कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते.‎ गेल्या १५ वर्षांत आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे खाण्यापिण्याचा‎ कल बदलला आहे. त्याला आता पाणी देखील अपवाद‎ राहिलेले नाही. पाण्याच्या तहानेने व्याकुळ झालेल्यांना‎ माठातील किंवा रांजणातील थंड पाणी मोफत मिळावे यासाठी‎ विविध सामाजिक संस्थांकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच‎ पाणपोई सुरू केल्या जात होत्या. ग्रामीण भागातून शहरात‎ बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांना पाणपोईतून स्वतःच्या‎ हाताने थंड पाणी घेऊन पिता येत होते.

मात्र गेल्या काही वर्षात‎ पाणपोई जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.‎ नगर शहरात अवघ्या चार ते पाच पाणपोई सध्या सुरू आहेत.‎ त्यातही पूर्वीसारखे रांजण किंवा माठ नाहीत तर अत्याधुनिक‎ इलेक्ट्रिक फ्रिजचे थंड पाणी या पाणपोईवर मिळते. दहा वर्षांत‎ पाणी बाटल्यांचा बाजार ८५ टक्क्यांनी वाढला आहे. दहा‎ वर्षापूर्वी दररोज ३० हजार पाण्याच्या बाटल्यांची शहरात विक्री‎ होत होती. नगर शहरात हॉटेल, रेस्टॉरंट याचबरोबर किरकोळ‎ दुकानातून दररोज १ लाख ५० हजार बाटलीबंद पाण्याची विक्री‎ होते. नगर शहरात विविध कंपन्यांच्या पाणी बाटल्या विक्रीसाठी‎ येतात. ७ रुपयांपासून ते ८० रुपये किमतीच्या या पाण्याच्या‎ बाटल्या बाजारात उपलब्ध आहेत. शहरात विविध कंपन्यांच्या‎ बंद पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणारे १४ डीलर आहेत.‎

सार्वजनिक कार्यक्रमांतही‎ जारच्या पाण्याचा वापर‎
नगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण‎ भागात फिल्टरने पाणी तयार‎ करण्याचे अनेक कारखाने आहेत‎ शिवाय बंद पाण्याच्या बाटल्या तयार‎ करण्याचे कारखाने आहेत. सध्या‎ सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा‎ घरगुती कार्यक्रम असो यात‎ पिण्यासाठी जारचे पाणी मोठ्या‎ प्रमाणात वापरण्यात येते.‎

डीएसपी चौकातील पाणपोई‎ भागवते शेकडोंची तहान‎
नगर शहरातील नगर -औरंगाबाद रस्त्यावर‎ असलेल्या डीएसपी चौकातउद्योजक नरेंद्र‎ फिरोदिया यांच्या निवासस्थानाच्या भिंतीजवळ‎ २०१७ मध्ये छायाताई फिरोदिया यांनी‎ अत्याधुनिक फ्रिज ठेवून पाणपोई सुरू केली‎ होती. दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक या‎ पाणपोईवर आपली तहान भागवतात.‎

अल्कालाइन व माठातील‎ पाण्याची क्रेझ कायम‎
कोरोना नंतर आरोग्याप्रती‎ वाढलेली जागृती लक्षात घेऊन‎ अनेकजण फिल्टर युक्त पाणी‎ तसेच अल्काइन पाणी पिण्यासाठी‎ वापरत आहेत. शिवाय फ्रिज पेक्षा‎ माठातील पाणी चांगले म्हणून‎ अनेक जण माठातील पाण्यानेच‎ आपली तहान भागवताना‎ दिसतात.‎

मे मध्ये चार पटीने मागणी वाढेल
‎ मार्च महिन्यात पाऊस व ढगाळ वातावरणामुळे‎ पाण्याच्या बाटल्याची मागणी कमी असली तरी‎ पुढच्या एप्रिल, मे महिन्यात पाण्याची मागणी चार‎ पटीने अधिक वाढणार आहे. मे महिन्यात नगरला‎ दररोज पाच लाख पाण्याच्या बाटल्या लागतील.‎ हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, केटरर्स व घरगुती‎ कार्यक्रमांसाठी पाण्याच्या बाटलीची मागणी असते.‎ ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक महिना अगोदर‎ जास्त पाण्याच्या बॉटलची ऑर्डर द्यावी लागते.‎ अतुल सातपुते, प्रमुख पाणी बाटली वितरक, बागगडपट्टी‎

शहाजी चौकात ३५ वर्षांपूर्वी सुरू‎ झाली होती पहिली पाणपोई‎
नगर शहरात येणारे ग्राहक बहुतांशी ग्रामीण भागातून येत‎ होते. १९८५ या कालावधीत नगर शहरात व्यापारी‎ असोसिएशन संघटनेने शहाजी चौक येथे पहिली पानपोई‎ सुरू केली होती.नगर शहरातील ही पहिली पाणपाेई‎ होती.त्यानंतर पानपोईंची संख्या वाढत गेली.आता मात्र‎ बोटावर मोजण्या इतक्याच पाणपोई उरल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...