आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:प्रत्येकाने दैनंदिन भोजनात विषमुक्त‎ अन्नधान्य आणि गावरान वाण खावेत‎

अकोले‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चल गं सुंदरा, आपण जाऊ डोंगरा,‎ आम्ही जाऊन डोंगरा, खातो करवंद‎ रानमेवा//" हे आदिवासी लोकगीत‎ चालीवर गाऊन बीजमाता पद्मश्री‎ राहीबाई पोपेरे यांनी उपस्थितांचे लक्ष‎ वेधून घेतले. निमित्त हाेते. अकोले‎ तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा‎ येथील महालक्ष्मी विद्यालयाच्या वार्षिक‎ पारितोषिक वितरण समारंभाचे. यावेळी‎ राहीबाई पोपेरे यांनी सर्वांनीच मानवी‎ आरोग्याबाबत सतर्क राहून शहरी व‎ ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या‎ दैनंदिन भोजनात विषमुक्त अन्नधान्य व‎ गावरान वाण दररोजच खावेत.

ते‎ उपलब्ध होण्यासाठी इमारतीच्या‎ टेरेसवर, घराच्या परसबागेत, घरापुढील‎ व घरामागील जागेवर, कुंडीत, शेतातून‎ व ते मिळवण्यास शक्य होईल त्या सर्व‎ ठिकाणांहून विषमुक्त अन्नधान्य‎ उपलब्ध करण्याबाबत जनजागृती‎ करण्यावर भर द्यावा, असे आवाहन‎ त्यांनी केले.‎ अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटी‎ अकोले, संचालित महालक्ष्मी माध्यमिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव‎ नाकविंदा येथे वार्षिक पारितोषिक‎ वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानी अगस्ती‎ रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष‎ अॅड. वसंतराव मनकर हाेते.

यावेळी‎ नाशिक बायफ संस्थेचे विभागीय‎ अधिकारी जितीन साठे, साहित्यिक‎ सूर्यकांत शिंदे, अकोले तालुका पत्रकार‎ संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय‎ पोखरकर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भाऊसाहेब कासार, प्रमोद मंडलिक,‎ भाऊसाहेब काळे, शहबाज शेख,‎ सर्वोदय विद्या मंदिर खिरविरेचे प्राचार्य‎ लहानू पर्बत, प्राचार्य सुनील धुमाळ,‎ अहमदनगर शिक्षक बँकेचे माजी‎ उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे, कबड्डी‎ असोसिएशनचे राज्य पंच अनिल‎ चासकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष‎ वाळीबा लगड अादी उपस्थित होते.‎ अॅड. वसंतराव मनकर, जितीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ साठे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.‎

कला, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य संपादन‎ केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते‎ प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.‎ यावेळी अॅड. वसंतराव मनकर यांचा‎ वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा‎ करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य‎ सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन‎ शिक्षक रामदास कासार यांनी केले.‎ विजय भालेराव यांनी आभार मानले.‎

गरिबीला लाजू नका व‎ श्रीमंती असेल तर माजू नका‎ पद्मश्री पोपेरे म्हणाल्या, दुसऱ्याकडे जे‎ चांगले आहे ते घ्या. गरिबीला लाजू नका‎ व श्रीमंती असेल तर माजू नका.‎ भविष्यात चांगले तेच काम करा.‎ शेतकऱ्यांनी माती चांगली राखली तरच‎ अन्न चांगले मिळेल, आणि अन्न चांगले‎ तरच आपली व पुढची पिढी चांगली‎ जगेल. म्हणूनच आपण निसर्गाला धरून‎ चला. आजाराला बळी पडू नका.‎ त्यासाठी मेहनत करा, सातत्य ठेवा,‎ निसर्गाची शाळा शिकून खूप मोठे व्हा,‎ असा सल्ला पोपेरे यानी दिला.‎ बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, अॅड वसंतराव मनकर, जितीन साठे, सुर्यकांत शिंदे,‎ विजय पोखरकर, भाऊसाहेब कासार, प्रमोद मंडलिक प्राचार्य लहानू पर्बत, प्राचार्य‎ सुनिल धुमाळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...