आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण कितीही चांगली जीवन शैली जगत असलो तरी कर्करोग हा छुपा आजार आहे. आज कर्करोग दिनानिमित्त आपण कर्करोगमुक्त भारत असा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन अामदार संग्राम जगताप यांनी केले. जिल्हा रूग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त गरूड कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रेडिएशन सेंटरतर्फे कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.दर्शना धोंडे होत्या. बाळासाहेब खेडकर उपस्थित होते. कर्करोग तज्ञ डॉ. प्रकाश गरूड म्हणाले, कर्करोग हा प्राणघातक आजार असला तरी लवकर निदान व उपचार मिळाल्यास तो पूर्ण बरा होवू शकतो. कर्करोग शरीरात चोर पावलांनी प्रवेश करतो. जेव्हा तो वाढतो तेव्हाच लक्षणे दिसतात. प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.