आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:‘वसुधैव कुटुंबकम्'' संकल्पनेवर‎ व्हावी कुटुंब, समाज, राष्ट्रउभारणी‎

नगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वसुधैव कुटुंबकम'' ही संकल्पना‎ परंपरागत तयार झालेली आहे. कुटुंब‎ व्यवस्था भक्कम, सुदृढ होण्यासाठी‎ सहवास, सन्मान, संवाद, समज,‎ समन्वय, समरसता आणि सायोजकता‎ या शब्दसूत्रींचा अवलंब केला पाहिजे,‎ तरच कुटुंब आणि जीवन समृद्ध होते.‎ ‘कुटुंब प्रबोधन'' हा सर्वांच्या‎ जिव्हाळ्याचा, आत्मियतेचा आणि‎ जवळकीचा विषय आहे. आपले कुटुंब‎ हे समाजापासून वेगळे नाही.‎ कुटुंबांपासून समाज, राष्ट्र, विश्व तयार‎ झाले असल्याचे प्रतिपादन समर्थभक्त,‎ रामकथाकार, श्री मंदार बुवा रामदासी‎ यांनी केले.‎ कुटुंब प्रबोधन विभाग, नगर यांच्यातर्फे‎ मधुरंजनी कार्यालयात आयोजित‎ व्याख्यानमालेत कुटुंब‎ व्यवस्थापनाविषयी ‘मन प्रबोधन'' या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विषयावर समर्थ भक्त मंदार बुवा‎ रामदासी बोलत होते. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांत समन्वयक‎ रवींद्र देशपांडे होते. कार्यक्रमाचे‎ उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते‎ दीपप्रज्ज्वलन करून व भारतमातेला‎ पुष्पहार घालून करण्यात आले.‎

सांस्कृतिक आयमाचे महाराष्ट्र प्रांत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रमुख नंदकुमार देशपांडे यांनी‎ सूत्रसंचालन केले. प्रमोद सोनटक्के‎ यांनी नगर शहराचे कुटुंब प्रबोधनाच्या‎ कार्याचा आढावा घेतला. प्रांत‎ संयोजक रवींद्र जी. देशपांडे यांनी‎ कुटुंब प्रबोधन कार्याची आवश्यकता‎ विषद केली. आनंद ठिपसे यांनी‎ आभार मानले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संघाचे महेंद्र, हिराकांत रामदासी,‎ प्रवीण कुलकर्णी, राजाभाऊ काळे,‎ संस्कार-भारतीचे ॲड. दीपक शर्मा‎ आदी यावेळी उपस्थित होते. भार्गव‎ देशपांडे यांनी पद्य सादर केले.‎ कार्यक्रमाची सांंगता पंडित हर्षद भावे‎ यांनी आपल्या मधुर आवाजातील‎ पसायदानाने केली.‎

कुटुंब प्रबोधनाचे‎ कार्य देशभर‎
संपूर्ण देशभर कुटुंब प्रबोधन विभागाचे‎ कार्य, संवाद आणि संपर्क या माध्यमातून‎ केले जात आहे. सुरुवातीला मी‎ माझ्याकडे पाहिले पाहिजे, या धारणेने‎ सर्व कुटुंबे तयार होतील. पावसाचे पाणी‎ आणि संतांची वाणी आपणा सर्वांचे‎ जीवन समृद्ध करीत असल्याचे या वेळी‎ रवींद्र देशपांडे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...