आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारी अवकाळी व गारपिटीचा पाऊस झाला. त्याचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. शनिवारी शहरात दुपारी १ वाजता व सायंकाळी ४ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दरम्यान, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः नैसर्गिक परिस्थितीत पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.
गारपिटीच्या व वादळी वाऱ्याच्या पावसामुळे फळबागातील संत्री, मोसंबी तसेच आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगर शहरातील बहुतेक रस्त्यावर जून, जुलैतील पावसामुळे खड्डे कायम असताना या अवकाळी पावसामुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे निर्देश
अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वे करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महसूल कर्मचारी संपावर असले तरी त्यांनी नैसर्गिक आपत्तीत स्वतःहून पंचनामे करण्याची तयारी दर्शवली आहे. संप कालावधीत आरोग्य सेवा, पाणी व्यवस्था सुरळीत आहे, त्याचा मोठा विषय नाही, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.