आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिसरातील देडगाव, पाचुंदे, तेलकुडगाव, देवसडे, येथे अवकाळी वारा गारपीट व पावसाने शेतकर्यांच्या गहू, हरबरा, मका पिकांसह आंबा, डाळिंब, या फळबागांची मोहोर व फळे गळुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. वादळामुळे आंबा बागांत कैऱ्यांचा सडा पडला. त्याचबरोबर गव्हाचे मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या गारंच्या पावसामुळे बळीराजांची मोठी तारंबळ उडाली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जेऊर हैबतीचे सरपंच महेश म्हस्के यांनी केली आहे. दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे, पाऊस व गारपीटीने आंबामोहोरचे व डाळिंब बहाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नेवासे तालुक्यातील फळबागेचे प्रचंड नुकसान झाले होते.
त्याचे पंचनामे केले होते मात्र अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नेवासा तालुक्यातील फळबागेला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नव्हती. आता देखील अवकाळी वादळ वारे गारपीटीने झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करावी, अशी मागणी ठाकरे गट सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.