आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती ‎:प्रोत्साहन दिल्यास मुली प्रत्येक क्षेत्रात होतात यशस्वी‎

नगर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आपण आधुनिक समाज निर्माण‎ झाला असल्याचे म्हणतो, परंतु‎ प्रत्यक्षात तसे आहे का. मुलगी‎ झाल्यानंतर अनेकजण नाराज होतात.‎ मुलगा वंशाचा दिवा असला तरी‎ मुलगी ही पणती आहे. मुलांवर चांगले‎ संस्कार करुन आपल्या संस्कृती‎ रक्षणाचे फार मोठे काम स्त्रिया करत‎ आहेत. मुलीच अभ्यासातील प्रगती‎ आणि विविध परिक्षांतील यश‎ कुटुंबाबरोबरच शाळेचे नाव चमकवत‎ आहेत. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन‎ दिल्यास कोणत्याही क्षेत्रात त्या यशस्वी‎ होतील, असा शंका नाही, असे‎ प्रतिपादन डॉ. सुधा कांकरिया यांनी‎ केले. यावेळी त्यांनी मुलींचा सन्मान‎ करण्याची शपथ उपस्थितांना दिली.ग. ज. चितांबर कन्या विद्या मंदिरयेथे '' बेटी बचाओ... बेटी पढाव'' हाउपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगीरोटरी क्लबचे अध्यक्ष पुरुषोत्तमजाधव, नीलेश वैकर, प्रिती बोरकर,अनघा राऊत, साधना देशमुख, नेहा‎ जाधव, मुख्याध्यपिका विभावरी रोकडे‎ आदि उपस्थित होते.

पुरुषोत्तम जाधव म्हणाले, शालेयतसेच महाविद्यालयापासून अनेकपरिक्षांत मुलीच बाजी मारताना दिसतआहेत. त्यामुळे मुलींच्या कर्तृत्वालाआपणही प्रोत्साहन दिले पाहिजे.सरकारही यासाठी विविध पातळ्यांवरप्रयत्न करत आहेत. बेटी बचाओ...‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बेटी पढाओ... हे अभियान प्रत्यक्ष‎ कृतीत आणण्याची गरज आहे.‎ स्त्रीयांनीच याबाबत आणखी पुढाकार‎ घेऊन मुलगा-मुलगीमध्ये भेदभाव न‎ करता त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रोत्साहन दिले पाहिजे.‎ याप्रसंगी ज्या घरात फक्त मुली‎ आहेत, अशांचा प्रशस्तीपत्रक देऊन‎ सन्मान करण्यात आला. यावेळी‎ मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यालयात मुलींच्या प्रगतीचा आढावा‎ सादर केला. याप्रसंगी मंजूषा जोशी,‎ गणेश उघडे, सोपानदेव शिंदे, अरुण‎ इघे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत‎ कुलकर्णी यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...