आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदिच्छा भेट:बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता असेल, तर चालतो कारभार‎

नगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची‎ असते. योग्य शिस्त असेल, तरच‎ कारभार चालतो. सहकारमहर्षी स्व.‎ सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल‎ पतसंस्थेचा मागील २२ वर्षांचा प्रवास‎ ठेवीदार, कर्जदारांसाठी मोठं बळ‎ देणारा आहे. स्व. गुंदेचा यांनी‎ बँकिंगच्या माध्यमातून व्यापारी,‎ उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभं‎ केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, तथा‎ आमदार बाळासाहेब थोरात यांनी‎ केले.‎ थोरात नगर शहराच्या दौऱ्यावर‎ आले असताना, त्यांनी पतसंस्थेच्या‎ मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूस‎ सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बोलत होते.

मागील महिन्यात या‎ वास्तूचे लोकार्पण सहकारमंत्री‎ अतुल सावे, आमदार राम शिंदे‎ यांच्या उपस्थितीत पार पडले होते.‎ त्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव आ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ थोरात उपस्थित राहू शकले नव्हते.‎ त्यामुळे शहरात आल्यानंतर त्यांनी‎ नूतन विस्तारित इमारतीची पाहणी‎ करीत शुभेच्छा दिल्या. या वेळी आ.‎ लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ किरण काळे, संचालक मनोज‎ गुंदेचा, चेअरमन किरण शिंगी,‎ व्हाईस चेअरमन विनय भांड,‎ संचालक शांतीलाल गुगळे, सीए‎ विशाल गांधी, सीए संकेत पोखरणा,‎ प्रमोद डागा, व्यापारी असोसिएशनचे‎ अध्यक्ष राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी,‎ अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे,‎ शंकर आव्हाड, प्रशांत जाधव,‎ आकाश आल्हाट आदी उपस्थित‎ होता.‎ आ. थोरात म्हणाले, की स्व.‎ सुवालालजी यांनी सेवा म्हणून‎ बँकिंग क्षेत्रात काम केलं.‎ ठेवीदारांचा पैसा हा आपला पैसा‎ असून, त्याच्या रक्षणाची‎ जबाबदारी आपली असल्याच्या‎ भावनेतून काम केलं.

आज‎ सहकारी क्षेत्रातील अनेक बँकांची‎ दुरवस्था काय आहे, हे सर्वांना‎ माहीत आहे. मात्र, ही पतसंस्था‎ याला अपवाद आहे. मनोज गुंदेचा‎ त्यांचा वारसा समर्थपणे चालवत‎ असून, त्यांनीही कामकाजात‎ पाळलेली पारदर्शकता, शिस्तीमुळे‎ सभासदांचा पतसंस्थेवर मोठा‎ विश्वास आहे. त्यामुळेच मोठ्या‎ रकमेच्या ठेवी आज पतसंस्थेकडे‎ आहेत.‎ मनोज गुंदेचा यांनी नवीन‎ इमारतीची माहिती आ. थोरात यांना‎ दिली. ते म्हणाले की, स्व.‎ सुवालालजी आणि आ. थोरात‎ यांच्यात दृढ व्यक्तिगत ऋणानुबंध‎ होता. त्यामुळे नेहमी गुंदेचा‎ परिवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे‎ काम त्यांनी केले आहे.‎ पतसंस्थेच्या सभासदांचा विश्वास‎ कायम टिकवून ठेवणे ही आमची‎ जबाबदारी असून याला कधीही‎ तडा जाऊ दिला जाणार नाही.‎

बातम्या आणखी आहेत...