आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास‎ परिस्थिती आडवी येत नाही‎

नगर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास गरिबी‎ व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:त‎ आत्मविश्‍वास असण्याची गरज आहे.‎ परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी‎ शिक्षण घेऊन जीवनातील ध्येय‎ गाठण्याची गरज आहे. शिक्षणानेच‎ परिस्थिती बदलण्याची शक्ती‎ असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना ध्येय‎ ठरवावे, असे आवाहन सेवाप्रीतच्या‎ संस्थापक अध्यक्ष जागृती ओबेरॉय यांनी‎ केले.‎ सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने‎ लालटाकी, भारस्कर कॉलनी येथील‎ स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन‎ मधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टेबल‎ व बसण्यासाठी सतरंज्या भेट देण्यात‎ आल्या.

त्यावेळी त्या बाेलत होत्या.‎ यावेळी निशा धुप्पड, डॉ. सिमरन‎ वधवा, अर्चना खंडेलवाल, सविता‎ चड्डा, गीता नय्यर, विणा ओबेरॉय, डॉ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोनाली वहाडणे, बालभवनच्या‎ समन्वयक रुबिना शेख, सुनीता‎ सोळसकर, संतोष बेदरकर आदी‎ उपस्थित होते.‎ डॉ. सिमरन वधवा यांनी प्रेरणादायी‎ कथेतून यशाचे गुपित विद्यार्थ्यांसमोर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उलगडले, तर स्वतःमधील क्षमता‎ ओळखण्याचे आवाहन केले. प्रत्येकात‎ वेगवेगळ्या क्षमता आहे. त्या क्षमता‎ ओळखल्यास यश मिळवता येणार‎ असल्याचे त्यांनी सांगितले. सेवाप्रीतच्या‎ महिलांनी बालभवन मधील विद्यार्थ्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अल्पोपहाराचे व चॉकलेटचे वाटप करुन‎ त्यांच्याशी संवाद साधला. या‎ उपक्रमासाठी सेवाप्रीतच्या सदस्या नताशा‎ धुप्पड, गीता धुप्पड, विणा ओबेरॉय, विणा‎ खुराणा, रिटा बक्षी, अर्चना ओबेरॉय, डॉ.‎ सोनाली वहाडणे, अंशू कंत्रोड, रविंदर‎ धुप्पड, संगीता अ‍ॅबट, दिशा ओबेरॉय यांचे‎ सहकार्य लाभले. बालभवनच्या‎ विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल‎ रुबिना शेख यांनी आभार मानले.‎

गरजू घटकांना‎ शिक्षणासाठी आधार‎
गरजू घटकातील विद्यार्थी हे‎ समाजातील घटक आहे. त्यांना‎ विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी‎ शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी‎ सेवाप्रीत गरजू घटकांना शिक्षणासाठी‎ आधार देत आहेत, असे ग्रुप लीडर‎ निशा धुप्पड यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...