आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख वणवा:कोपरगावात पारा‎ गेला 42 अंशावर‎, रस्ते निर्मनुष्य अघोषित‎ संचारबंदी सारखे‎ वातावरण‎

प्रतिनिधी | कोपरगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसानंतर आता वाढत्या‎ उन्हाचा कहर सुरू झाला आहे.‎ गेल्या चार पाच दिवसांपासून उन्हाचा‎ चटका वाढला असून पुढील तीन‎ दिवस उन्हाचा तडाखा अधिक‎ जाणवणार आहे, असा वेधशाळेचा‎ अंदाज आहे. कोपरगावात‎ तामपानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस‎ इतका नोदविला गेला. त्यामुळे‎ दिवसभर जनतेच्या अंगाची‎ लाहीलाही झाली. उन्हाची तीव्रता‎ लक्षात घेऊन, सतर्कता बाळगा.‎ उष्माघाताचे लक्षणे दिसताच‎ डॉक्टरांशी संपर्क साधा, असे‎ आवाहन जिल्हा प्रशासनाने जनतेला‎ केले. शनिवारी दुपारी अक्षरशा‎ अघोषित संचार बंदीसारखे चित्र‎ दिसत हाेते.

खेडेपाडा वाड्या‎ वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई‎ जाणवत आहे. गोदावरी नदीत पाणी‎ आहे. परंतु ते खराब झाले आहे,‎ त्यामुळे रानवाण भटकणाऱ्या‎ जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी‎ तारांबळ होत आहे.‎ गेल्या दोन महिन्यांपासून जनता‎ अवकाळी पावसाने मधेच पडणारी‎ थंडी याने त्रस्त झाली. अाता मात्र‎ उष्माघाताचा प्रकोप पाहता दुपारी‎ घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर‎ पडताना टोपी, कानाला उपरणे‎ अथवा छत्रीचा वापर करा.

शक्यतो‎ दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर‎ पडू नका, पुरेसे पाणी प्या. तहान‎ लागली नसेल तरीही दर अर्ध्या‎ तासाने पाणी प्या. सूर्य प्रकाशापासून‎ वाचण्यासाठी घरातील पडदे व‎ झडपांचा वापर करावा. प्रवासात‎ पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, उन्हात‎ काम करणाऱ्यांनी ओल्या कापडाने‎ डोके, मान व चेहरा झाकावा,‎ चक्कर येत असल्यास तत्काळ‎ डॉक्टरांशी संपर्क साधावा, दारू,‎ चहा, कॉफी घेऊ नये, उच्च‎ प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न‎ खाऊ नका, असे आवाहन जिल्हा‎ प्रशासनाने व डॉक्टरांनी नागरिकांना‎ केले. गेल्या आठ दिवसांपासून‎ उन्हाची तीव्रता वाढू लागली. अजून‎ ती तीन ते चार दिवस राहील.‎ सकाळपासूनच गरम होण्यास‎ सुरुवात होते. विजेचा लपंडावा ने‎ नागरिक हैराण झाले.