आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरणामध्ये जसे बदल होतात आणि त्या बदलांमुळे माणसं आजारी पडतात. अगदी तसेच पिकांच्या बाबतीत देखील होत असते. उन्हाळा संपला, पावसाळा चालू झाला की व्हायरस चालू होत असतो आणि तो टोमॅटोमध्ये सुरुवातीला आढळून येतो.अति विषारी रासायनिक किटकनाशकांचा फवारण्या त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कमी - जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा ,जास्त पाणी किंवा जास्त पाण्याचा ताण आणि जमिनीत वाढत असलेले क्षार हे टोमॅटो पिकातील व्हायरस रोग वाढी मधील प्रमुख कारणे आहेत, अशी माहिती डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली. ते म्हणाले, टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याद्वारे जमिनीमध्ये क्षार मोठ्या प्रमाणात जातात आणि क्षार वाढले की सूत्रकृमी वाढतात व सूत्रकृमी वाढले की मुळकुज होते व मुळकूज झाली की कुपोषण होते आणि कुपोषण झाले की तिथे व्हायरस आलाच अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसते म्हणून या परिस्थितीवर नियंत्रण आणायचे असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणे गरजेचे आहे .तेव्हा मररोग व सूत्रकृमी यांचे नियंत्रण करुन पिकास पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा चालू झाला पाहिजे.आणि ते चालू झाल्यानंतर व्हायरस चा साधारणपणे १५ ते २५ दिवसांच्या दरम्यान पुर्नलागवडीनंतर टोमॅटो पिकामध्ये रिकव्हर ची २५० मिली आणि सिलिकॉन सुपर ५०० ग्रॅम मिसळून पहिली फवारणी घेणे अपेक्षित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.