आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकथेची सांगता:भारताची वाटचाल रामराज्याच्या दिशेने होतेय‎

नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात भारताची ताकद वाढत असल्याने‎ जगातील भारताचे शत्रू एकत्र येत‎ आपल्यावर युद्ध लादण्याची शक्यता आहे.‎ त्यास चोख उत्तर देण्यास आपण सक्षम‎ आहोतच. भारताची वाटचाल‎ रामराज्याच्या दिशेने होत आहे. हिंदुत्वाच्या‎ राजसत्तेला समृद्धी व आयुरारोग्य प्राप्त‎ होण्यासाठी सर्वांनी संकल्प व उपासना‎ करणे आवश्यक आहे. यासाठी‎ श्रीरामभक्ती व रामकार्याचे नियोजनबद्ध‎ ध्यान करावे, असे िनरुपण राष्ट्रीय‎ कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांनी‎ केले.‎

केडगाव ब्राह्मण सेवा संघाच्या‎ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित‎ रामकथा सप्ताहाच्या सांगता समारंभात‎ आफळे बुवा यांचे कीर्तन झाले. या‎ कार्यक्रमात आफळे बुवांच्या हस्ते घनपाठी‎ महेशशास्त्री रेखे गुरुजी, पंढरपूरकर गुरुजी,‎ इंजिनिअर अविनाश कुलकर्णी, पत्रकार‎ भूषण देशमुख, डॉ.विश्वास मुळे व‎ अनुराधा थिटे यांना ''ब्रह्मभूषण'' पुरस्कार‎ देऊन गौरवण्यात आले. तसेच अॅड.उमेश‎ नगरकर, मिलिंद कुलकर्णी, राजकुमार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जोशी, गजानन नेरीकर, अतुल देवचके,‎ किशोर थत्ते यांचाही ब्रह्मश्री पुरस्काराने‎ सन्मानित करण्यात आले.‎

चारुदत्त आफळे बुवा म्हणाले, न्यायाचे,‎ जनतेचे, धर्माचे राज्य येण्यासाठी छत्रपती‎ शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. त्यांना पूर्ण‎ भारतात हिंदवी स्वराज्य म्हणजेच‎ रामराज्यच निर्माण करायचे होते. दुर्दैवाने‎ त्यांना कमी आयुष्यमान मिळाले. छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या कथेत रामकथेचाच‎ प्रत्यय येतोय. केडगाव ब्राह्मण सेवा संघाने‎ दिलेले ''ब्रह्मभूषण'' पुरस्कार देण्याचे भाग्य‎ मला मिळाले.‎ तत्पूर्वी सज्जनगड येथील राघवेंद्रबुवा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देशपांडे यांच्या श्री रामकथेचा समारोप‎ शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने झाली.‎ यानिमित्त केडगाव परिसरातून वाजत गाजत‎ भव्य शोभायात्रा काढण्यात आली.‎

सजवलेल्या रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता‎ व हनुमानाच्या मुर्त्या ठेवण्यात आल्या‎ होत्या. दुसऱ्या सजवलेल्या रथात कथाकार‎ राघवेंद्र बुवा देशपांडे होते. ठिकठिकाणी‎ रांगोळ्या रेखाटून व पुष्पवृष्टीने शोभायात्रेचे‎ स्वागत नागरिक करत होते. महाप्रसादाने‎ रामकथेचा भक्तिपूर्ण वातावरणात समारोप‎ झाला. सांगता समारंभाचे सूत्रसंचालन‎ संपदा देशपांडे यांनी, तर आभार भूषण‎ पांडव यांनी मानले.‎

२५ वर्षांपासून धार्मिक व‎ सामाजिक उपक्रम‎केडगाव ब्राह्मण संघ गेल्या २५‎ वर्षांपासून अनेक धार्मिक व सामाजिक‎ उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना‎ सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा‎ प्रतिसाद मिळत आहे. या कार्यामुळे‎ केडगाव ब्राह्मण संघाची राज्यात‎ ख्याती पोहचली आहे, असे‎ डॉ.श्रीकृष्ण जोशी म्हणाले.‎ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित‎ सोहळ्यास प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व‎ नागरिकांचे आभार.‎

केडगाव ब्राम्हण सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या‎ हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब्रह्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...