आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरमार्थ हे महाधन आहे, परमार्थ धन देवापर्यंत घेऊन जाते. म्हणून मनुष्य जीवनात परमार्थ फार महत्त्वाचा आहे, ज्या घरात परमार्थ धन आहे तेथे मिळवलेले धन टिकते, म्हणून संतांनी जे दिले ते अति श्रेष्ठ आहे. संत महात्मे हे समाजाला देण्यासाठी येत असतात, अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजावर संतांचे उपकार आहेत, असे निरुपण नेवासेचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
काेपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र हिंगणी येथे वै. जोग महाराज पुण्यतिथी उत्सव व योगीराज तुकाराम बाबा यांची पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव निमित्त सुरू असलेल्या तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व हरिनाम सप्ताहात किर्तनात ते बोलत होते. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, महात्म्यांनी समाजाला जागवले आणि जगवलेही. "इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी" या माऊलींच्या उक्तीप्रमाणे महात्म्यांनी चालू केलेले कार्य अविरत चालू आहे. हा ज्ञानाचा भक्तीच्या प्रेमाचा वर्षाव त्यांनी केला. ही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती आहे. गायनाचार्य मनोहर महाराज कोठेकर व विठ्ठल महाराज सुलदलीकर तर मृदंग वादक मंगेश महाराज जाधव यांनी साथ दिली.
वै. जोग महाराज पुण्यतिथी उत्सव व प.पू. योगीराज तुकाराम बाबा यांची पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव निमित्ताने किर्तनात बोलताना उद्धव महाराज मंडलिक.दशरथे महाराज यांच्या किर्तनाने होईल साेमवारी सप्ताहाची सांगताया अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी, ६ फेब्रुवारी रोजी उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे.दररो ज सकाळी ८ ते ११ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. गाथा पारायण सोहळ्यासाठी ४०० भाविक बसलेले आहेत.
दशरथे महाराज यांच्या किर्तनाने होईल साेमवारी सप्ताहाची सांगताया अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी, ६ फेब्रुवारी रोजी उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे.दररो ज सकाळी ८ ते ११ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. गाथा पारायण सोहळ्यासाठी ४०० भाविक बसलेले आहेत. दररोज सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण व संध्याकाळचा महाप्रसाद याप्रमाणे नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रम चालू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.