आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. शेतीसमोर माती, प्रदूषित पाणी व वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर उत्तर शोधण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांंची असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५१ व्या बैठकीत गुरुवारी ते बोलत होते. कृषिमंत्री सत्तार म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी बियाणे निर्मितीमध्ये उच्चांक केलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करताना अडचण येणार नाही. कृषी विद्यापीठातील काम करण्याऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे काम हे शत्रू सैन्याबरोबर लढाई करणाऱ्या सैनिकांइतकेच मोठे आहे. सध्या शेतीमध्ये जमीनधारणा क्षेत्र घटक चालल्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन वापरताना अडचणी येऊ शकतात. यावर शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून पर्याय शोधला पाहिजे. परदेशातील विद्यापीठांबरोबर तसेच संस्थांबरोबर करीत असलेल्या सामंजस्य करारांमुळे संपूर्ण देश व परदेशातील विद्यापीठांनाही दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे करीत आहेत, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जॉईंट अॅग्रेस्को-२०२३ च्या स्मरणिकेचे आणि चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. चारही कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानांच्या प्रदर्शन दालनाचे तसेच सेंद्रिय शेती प्रकल्प, जैविक खत प्रकल्प आणि ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.
यावेळी राहुरी कृषी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ. पवन कुलवाल, अकोला कृषी विद्यापीठातील डॉ. रामेश्वर कुऱ्हाडे, परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. दीपक पाटील, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. भरत वाघमोडे यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या बैठकीस कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली), कुलगुरू डॉ. इंद्रमणी (परभणी), कुलगुरू डॉ. शरद गडाख (अकोला), कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे, दत्तात्रय उगले, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. संजय भावे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव प्रमोद लहाळे, कराड कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने आदी यावेळी उपस्थित होते.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५१ व्या बैठकीत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार.शास्त्रज्ञ हे शेतीचे सैनिक कृषी विद्यापीठांनी कमी खर्चामध्ये ड्रोन तयार केल्यास छोट्या शेतकऱ्यांना तो वापरता येईल. त्यामुळे खतांबरोबरच औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. राज्यातील कृषी विद्यापीठात विविध पिकांमध्ये संशोधन करून नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केलेली सेवा असून कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक आहेत, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५१ व्या बैठकीत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार.शास्त्रज्ञ हे शेतीचे सैनिक कृषी विद्यापीठांनी कमी खर्चामध्ये ड्रोन तयार केल्यास छोट्या शेतकऱ्यांना तो वापरता येईल. त्यामुळे खतांबरोबरच औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. राज्यातील कृषी विद्यापीठात विविध पिकांमध्ये संशोधन करून नवनवीन वाण तयार केले आहेत. ही एक प्रकारे संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केलेली सेवा असून कृषी शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक आहेत, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.