आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी संशोधन:शेतीसमोरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याची‎ जबाबदारी विविध कृषी शास्त्रज्ञांचीच‎ - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी‎ आता पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही. ‎ ‎ शेतीसमोर माती, प्रदूषित पाणी व‎ वातावरण बदलासारखे मोठे प्रश्न निर्माण ‎ ‎ झाल्याने त्यावर उत्तर शोधण्याची‎ जबाबदारी कृषी विद्यापीठातील‎ शास्त्रज्ञांंची असल्याचे प्रतिपादन‎ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.‎

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन‎ परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषी ‎विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‎राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास ‎समितीच्या ५१ व्या बैठकीत गुरुवारी ते‎ बोलत होते. कृषिमंत्री सत्तार म्हणाले,‎ राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी‎ बियाणे निर्मितीमध्ये उच्चांक केलेला‎ आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचा‎ पुरवठा करताना अडचण येणार नाही.‎ कृषी विद्यापीठातील काम करण्याऱ्या सर्व‎ शास्त्रज्ञांचे काम हे शत्रू सैन्याबरोबर‎ लढाई करणाऱ्या सैनिकांइतकेच मोठे‎ आहे. सध्या शेतीमध्ये जमीनधारणा क्षेत्र‎ घटक चालल्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोन‎ वापरताना अडचणी येऊ शकतात. यावर‎ शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून‎ पर्याय शोधला पाहिजे. परदेशातील‎ विद्यापीठांबरोबर तसेच संस्थांबरोबर‎ करीत असलेल्या सामंजस्य करारांमुळे‎ संपूर्ण देश व परदेशातील विद्यापीठांनाही‎ दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील कृषी‎ विद्यापीठे करीत आहेत, असेही कृषिमंत्री‎ अब्दुल सत्तार यांनी सांगितले.‎

यावेळी राज्यातील चारही कृषी‎ विद्यापीठांना संशोधनासाठी १०० कोटी‎ रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.‎ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते‎ जॉईंट अॅग्रेस्को-२०२३ च्या स्मरणिकेचे‎ आणि चारही कृषी विद्यापीठांच्या‎ प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.‎ चारही कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानांच्या‎ प्रदर्शन दालनाचे तसेच सेंद्रिय शेती‎ प्रकल्प, जैविक खत प्रकल्प आणि ड्रोन‎ पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते‎ झाले.

यावेळी राहुरी कृषी विद्यापीठाचे‎ वनस्पतीशास्त्र विषयातील प्राध्यापक डॉ.‎ पवन कुलवाल, अकोला कृषी‎ विद्यापीठातील डॉ. रामेश्वर कुऱ्हाडे,‎ परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. दीपक‎ पाटील, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ.‎ भरत वाघमोडे यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ‎ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या‎ बैठकीस कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील,‎ महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन‎ परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे,‎ सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन‎ संस्थेचे संचालक डॉ. आर. ए. मराठे,‎ कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली),‎ कुलगुरू डॉ. इंद्रमणी (परभणी),‎ कुलगुरू डॉ. शरद गडाख (अकोला),‎ कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे,‎ दत्तात्रय उगले, महाबीजचे कार्यकारी‎ संचालक सचिन कलंत्री, संशोधन‎ संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ.‎ संजय भावे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी‎ परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर‎ कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक‎ डॉ. तानाजी नरुटे, डॉ. बापुसाहेब भाकरे,‎ कुलसचिव प्रमोद लहाळे, कराड कृषी‎ महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.‎ साताप्पा खरबडे व कुलगुरुंचे विशेष‎ कार्याधिकारी डॉ. महानंद माने आदी‎ यावेळी उपस्थित होते.

‎राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कृषी संशोधन आणि विकास‎ समितीच्या ५१ व्या बैठकीत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार.‎शास्त्रज्ञ हे शेतीचे सैनिक‎ कृषी विद्यापीठांनी कमी खर्चामध्ये ड्रोन‎ तयार केल्यास छोट्या शेतकऱ्यांना तो‎ वापरता येईल. त्यामुळे खतांबरोबरच‎ औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा‎ आर्थिक फायदा होईल. राज्यातील कृषी‎ विद्यापीठात विविध पिकांमध्ये संशोधन‎ करून नवनवीन वाण तयार केले आहेत.‎ ही एक प्रकारे संशोधनाच्या माध्यमातून‎ शेतकऱ्यांची केलेली सेवा असून कृषी‎ शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक आहेत,‎ असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी‎ सांगितले.‎

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित कृषी संशोधन आणि विकास‎ समितीच्या ५१ व्या बैठकीत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार.‎शास्त्रज्ञ हे शेतीचे सैनिक‎ कृषी विद्यापीठांनी कमी खर्चामध्ये ड्रोन‎ तयार केल्यास छोट्या शेतकऱ्यांना तो‎ वापरता येईल. त्यामुळे खतांबरोबरच‎ औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा‎ आर्थिक फायदा होईल. राज्यातील कृषी‎ विद्यापीठात विविध पिकांमध्ये संशोधन‎ करून नवनवीन वाण तयार केले आहेत.‎ ही एक प्रकारे संशोधनाच्या माध्यमातून‎ शेतकऱ्यांची केलेली सेवा असून कृषी‎ शास्त्रज्ञ हे शेतीचे खरे सैनिक आहेत,‎ असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी‎ सांगितले.