आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्हा परिषदेत प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तीन दिवसांत तब्बल २२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अपेक्षीत ठिकाणी जागा न मिळाल्याने अनेकांनी विनंती बदल्यांत नकार दिला.
जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदली प्रक्रियेत सवलत असलेल्या कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आदीची पडताळणी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. तसेच सादर केलेले प्रमाणपत्र चुकीचे आढळल्यास कारवाईची तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी दिली होती. या बदलीप्रक्रियेकडे जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचे लक्ष होते.
प्रमाणपत्रांची पडताळणी
महिला बालकल्याण विभागातील ८, पशु संवर्धन १४, लघुपाटबंधारे १, ग्रामीण पाणीपुरवठा १, बांधकाम ९, आरोग्य ५२, ग्रामपंचायत ५९ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी १६, विस्तार २, शिक्षण विभागातील १६, सामान्य प्रशासनातील ४३, अर्थ विभागातील ६ तर कृषी विभागातील १ कर्मचाऱ्याची बदली झाली. या बदली प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एका कर्मचाऱ्याच्या प्रमाणपत्राबाबत संशय आल्याने पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.
एकूण २२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
बदली प्रक्रियेत मुख्यालयी पसंती असलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांकडून बांधकाम, लघुपाटबंधारे विभागाला पसंती होती, तर राहुरी पंचायत समितीसाठी अनेकांनी विनंती केली. आतापर्यंत एकूण २२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्यसेवक महिलांच्या १६ प्रशासकीय तर १५ विनंती व ७ आपसी बदल्या झाल्या. औषध निर्माण अधिकारी पदाच्या १४ बदल्या झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.