आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार, आमदारांची पेन्शन रद्द करून राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी सोमवारी केली. याबाबत देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, हिमाचल सारख्या राज्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य झाले आहे , मग महाराष्ट्रासारख्या राज्यालाच हे का शक्य होत नाही ?,असा सवालही देशमुख यांनी विचारला आहे. एकीकडे राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल, अशी मांडणी करीत आहे.
मात्र ही मांडणी करत असतानाच अन्य बाबींकडे डोळेझाक करीत आहे. ६० वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यास नव्या योजनेनुसार किमान १५०० ते ७००० रुपये पेन्शन मिळण्याची तजवीज आहे. मात्र निवृत्त आमदारांना किमान ५० ते १,२५,००० रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते. नव्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळच्या पगाराच्या केवळ ८ टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. जुन्या पेन्शन योजनेनुसार हीच रक्कम निवृत्तीच्या वेळी असलेल्या पगाराच्या ५० टक्के इतकी हाेते. जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात सुसह्यपणे जगणे शक्य होणार होते. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सक्रिय आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.