आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. मात्र, याबाबत आमच्या मनात कधीच शंका नव्हती, पण आता राज्यातील सरकार कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी गुरुवारी केला.
नगर शहर, उत्तर नगर व दक्षिण नगर या तीन जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांबरोबरच पदाधिकाऱ्यांची भंडारी यांनी मते जाणून घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले माधव भंडारी?
भंडारी म्हणाले, राज्यातील सरकार घटनेतील सर्व तरतुदींचे, कायद्याचे व संकेतांचे पालन करून लोकशाही मार्गाने स्थापन झाले होते व त्यामुळे तशी भूमिका ही आम्ही आधीपासूनच मांडत आलो आहोत. आमच्या या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे, असा दावा भंडारी यांनी केला.
अभ्यास करून भाष्य करेन
ते म्हणाले,काही तरतुदी व निरीक्षणे व्यक्त करून ती मोठ्या पिठाकडे पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्यावर आता सुनावणी होईल. लोकशाही प्रक्रियेने तिथे भूमिका मांडल्या जातील व त्यात होणाऱ्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे व निकाल पत्र वेगळे आहेत.
त्यामुळे राज्यपालांची भूमिका व गोगावले यांची भूमिका याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल पत्राचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर न्यायालयाची निरीक्षणे व निकाल पत्रात नेमके काय म्हटले आहे, हे समजून घेतल्यानंतर व त्यांचा अभ्यास केल्यावर त्याबाबत अधिक भाष्य करणे योग्य राहील. \
चांगली साथ दिली
गंधे शहर भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भैय्या गंधे म्हणाले, गेले साडे तीन वर्षे मी पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी मी पार पडली आहे. मला सर्वांनी चांगली साथ दिल्याने मी काम करू शकलो, याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.