आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसराच्या ग्रामीण भागातील मैलामिश्रित सांडपाणी सरसकट सीना नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली असून, नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा विचार करता, मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत न सोडता शहराच्या बाहेर मोठा तलावासारखा हौद करुन त्यात हे मैलामिश्रित सांडपाणी साठवण करुन ठेवावे.
त्यावर प्रक्रिया करुन पाण्याचे शुद्धीकरण करावे. त्यानंतर ते जवळपासच्या शेतीला देता येईल. तसेच हौदात साचलेला गाळ, मातीपासून खत निर्माण करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. मनपा आयुक्त पंकज जावळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सर्वश्री भुजबळ, राजाभाऊ पडोळे, श्रींकात मांढरे, सुनील भिंगारे,कुंडलिक गदादे, रमेश बिडवे,वैभव पालवे, फिरोज खान, रमेश सानप, माऊली गायकवाड,योगेश पिंपळे, रुपाली पुंड, ज्योती घोरपडे आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.