आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वाळू डेपो विरोधात आमदार‎ गडाख ग्रामस्थांसह मैदानात‎, उपोषणाचा तिसरा दिवस

प्रतिनिधी | सोनई‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील मुळाथडी परिसरातील ‎ अंमळनेर येथे मुळा नदीतून वाळू उत्खनन ‎ करून वाळू डेपो निंभारी येथे करण्याचा जो ‎ ‎ शासनाने घाट घातला असून त्याचा ‎ ‎ ग्रामस्थांसह विरोध करणार असल्याचे‎ आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‎ त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांना ‎ पाठिंबा दिला.‎ वाळू उत्खनन तसेच डेपो त्वरित रद्द‎ करावा, यासाठी मुळा काठच्या गावांनी ‎शासनाच्या विरोधात उपोषण‎ अंमळनेर-करजगाव रस्त्यावरील लक्ष्मी‎ काॅर्नर येथे सुरू केले असून आजचा‎ उपोषणाचा तिसरा दिवस असून माजी मंत्री‎ आमदार शंकरराव गडाख यांनी‎ उपोषणास्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना‎ लोकप्रतिनीधी या नात्याने पाठिंबा देऊन‎ तुमच्या मागे ठाम उभा असून मुळा‎ नदीपात्रातील एकही खडा उचलू देणार‎ नसून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न‎ प्रशासनाने केला, तर अख्खा तालुका‎‎ आंदोलनकर्त्यांचा मागे उभा करेल असे‎ आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.‎ मुळा काठच्या या गावातील अमळनेर‎ निंभारी, खुपटी, तिळापूर, इमामपूर,‎ गोणेगाव, वांजूळपोई, करजगाव, वाटापूर,‎ पानेगाव, मांजरी, खेडले परमानंद,‎ शिरेगाव, वाटापूर, पाचेगाव आदी गावातील‎ सरपंच, उपसरपंच, शेतकरी, सर्वसामान्य‎ नागरिक, शेतमजूर सामाजिक कार्यकर्ते‎ उपोषणात सहभागी झाले. उपोषणकर्ते‎ संपत किशन पवार वय ७६ यांची तब्येत‎‎ खालावल्याने अहमदनगर सिव्हिल ‎ ‎ हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी‎ दाखल करण्यात आले असल्याचे‎ आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात‎ आले. आजच्या तिसऱ्या दिवशी‎ परिसरातील गांव बंद आंदोलन तसेच‎ रास्ता रोको करण्यात आला. चौथ्या‎ दिवशी महिला रस्त्यावर उतरून‎ आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन‎ करण्यात येणार आहे. प्रवरेचा तिरी‎ असणारे पाचेगाव येथे आंदोलनला‎‎ पाठिंबा म्हणून निषेध सभा घेऊन गावबंद‎ ठेवण्यात आले. आम आदमी पार्टी, नेवासे‎ स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय‎ समाज पक्ष, प्रहार जनशक्तीच्या वतीने‎ आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.‎

वाळूउपस्याने पाणीटंचाई‎ निर्माण होईल‎

अमळनेर येथे वाळू डेपोसाठी वाळू‎ उत्खनन झाल्यास अमळनेर, पानेगाव,‎ निंभारी, वाटापूर, इमामपूर, गोणेगाव,‎ शिरेगाव व परिसरातील पाण्याची तीव्र‎ टंचाई निर्माण होऊ शकते व शेती उद्ध्वस्त‎ होऊ शकते. शासनाला नेवासे तालुक्यात‎ वाळू डेपो करून शेतकऱ्यांना देशोधडीला‎ लावायचे आहे का, असा संतप्त सवाल‎ आंदोलक शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.‎ तब्बल दहा वर्षांपूर्वीचे वाळूउपसा बंदीचे‎ ग्रामसभेचे ठराव असताना देखील वाळू‎ डेपोच्या नावाखाली वाळू तस्करील‎ एकप्रकारे खतपाणीच घातले जात आहे.‎ याविरोधात तीव्र संताप दिसून येत आहे.‎