आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:"मविआ''ला एमआयएमची मते हवी,‎ पण नेतृत्व नको - खासदार इम्तियाज जलील‎

प्रतिनिधी |नगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीने निमंत्रण दिले‎ तर आम्ही त्यांच्यासोबत जायला‎ तयार आहोत,‎ मात्र आघाडीला‎ एमआयएमची‎ मते हवी आहेत,‎ एमआयएमचे‎‎ नेतृत्व नको‎ आहे, अशी दुटप्पी भूमिका‎ चालणार नाही, असे स्पष्ट मत‎ एमआयएमचे खासदार इम्तियाज‎ जलील यांनी नगरमध्ये बोलताना‎ व्यक्त केले.‎ छत्रपती संभाजीनगरकडून‎ पुण्याकडे जाताना खासदार जलील‎ नगरमध्ये थांबले होते. त्यावेळी ते‎ पत्रकारांशी बोलत होते.

खासदार‎ जलील म्हणाले, महाविकास‎ आघाडीत काँग्रेसला राहुल गांधी‎ यांचे नेतृत्व हवे आहे. राष्ट्रवादीला‎ शरद पवारांचे नेतृत्व हवे आहे. मग‎ आमच्या पक्षाला आघाडीत आमचे‎ नेतृत्व का नको, असा प्रश्न त्यांनी‎ उपस्थित केला.‎ एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन थेट‎ देशाचे पंतप्रधान करतात हे विचार‎ करायला लावणारे आहे. उत्तर‎ प्रदेशच्या निवडणुकीत ''द काश्मीर‎ फाईल'' चित्रपट येतो. कर्नाटकच्या‎ निवडणुकीत ''द केरला स्टोरी''‎ चित्रपट येतो. हे केवळ जाती-धर्मात‎ तेढ निर्माण करून निवडणुका‎ जिंकण्याचे प्रयत्न आहेत, असा‎ आरोपही खासदार जलील यांनी‎ केला. मात्र कर्नाटकच्या निकालातून‎ जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून‎ दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.‎

कालिचरण महाराजांकडून‎ होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल‎ खासदार जलील यांनी जोरदार‎ टीका केली.‎ ते म्हणाले, अनेकजण भगवे कपडे‎ घालून साधू होतात, मात्र‎ त्यांच्याबद्दल समाजात आदर‎ असतो, असे नाही. भगवे कपडे‎ घालणाऱ्यांनी तोंड उघडले की ते‎ गरळ ओकतात. पोलिस, सरकार‎ आणि प्रशासन यांनी जर आपले‎ काम व्यवस्थित केले, तर‎ कालिचरण महाराजांसारखे भगवे‎ कपडे घातलेले जेलमध्ये असतील.‎ अन्यथा आम्हाला पोलिसांनी‎ परवानगी द्यावी, आम्ही कालीचरण‎ महाराजांना योग्य भाषेत उत्तर देऊ,‎ असाही इशारा त्यांनी दिला.‎