आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरकुले उभारणीत नगर जिल्हा राज्यात अव्वल

नगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुल योजनेला गती देण्यासाठी अमृत महा‎ आवास अभियान २० लहैंबर २०२२ ते ३१ मार्च‎ २०२३ या कालावधीत हाती घेण्यात आले. या‎ शंभर दिवसांत अहमदनगर जिल्ह्याने‎ प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात‎ सर्वोत्कृष्ट कामगिरी करत १० हजार १९९‎ घरकुलांची उभारणी केली. तर‎ राज्यस्तरावरील योजनेत ३ हजार १४२‎ घरकुलांची उभारणी करत दुसरे स्थान‎ पटकावले. राज्यस्तर योजनेत ३३३२‎ घरकुलांच्या उभारणीसह जालना नंबर‎ एकवर आहे.‎ अहमदनगर प्रथम क्रमांकावर आल्याची‎ माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष‎ येरेकर यांनी दिव्य मराठीला दिली. देशभरात‎ २०१६-२०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हाती घेण्यात आली होती. या योजनेंतर्गत‎ प्रतिलाभार्थी १ लाख २० हजारांचे अनुदान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिले जाते.

त्यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के तर‎ राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. शौचालय‎ नसल्यास अतिरिक्त १२ हजार व स्वत: मजूर‎ म्हणून नरेगांतर्गत काम केल्यास त्याचे‎ अतिरिक्त २३ हजार रोजंदारीचे लाभार्थ्याला‎ अदा केले जातात. तर राज्य सरकारमार्फत‎ राबवल्या जाणाऱ्या रमाई आवास, शबरी‎ तसेच पारधी घरकुल योजनेंतर्गत १०० टक्के‎ अनुदान अदा केले जाते.‎ घरकुलपात्र लाभार्थ्यांना १५ हजार आगाऊ‎ रक्कम दिली जाते. बांधकामाची प्लिंथ लेवल‎ झाल्यावर ४५ हजार, सात फुटापर्यंत‎ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ४० हजार तर‎ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २० हजार रक्कम‎ दिली जाते. जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेने‎ अमृत महा आवास अभियानात घरकूल‎ उभारणीला गती दिली. अहमदनगर‎ खालोखाल यवतमाळ ६ हजार ६७२‎ घरकुलांसह दुसऱ्या तर गोंदिया ६११४ घरकुल‎ उभारणीसह तिसऱ्या स्थानी आहे.‎

उद्दिष्टपूर्तीत नगर तिसऱ्या स्थानी‎
घरकुल योजना सुरू झाल्यानंतर‎ अहमदनगर जिल्ह्यासाठी ६० हजार ७६७‎ घरकुलांचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत नगरने‎ ४८ हजार २७९ घरकुले उभारून राज्यात‎ तिसरे स्थान पटकावले. राज्याच्या‎ योजनेसह उभारणीचा आकडा ७५ हजार‎ ७८८ आहे. गोंदीया जिल्ह्याला ९६११३ चे‎ उद्दिष्ट असताना, सर्वाधिक ८४२२३‎ घरकुल उभारून उद्दिष्टपूर्तीत पहिल्या‎ स्थानावर आहे. ७२४६० घरे उभारून‎ नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे.‎

बातम्या आणखी आहेत...