आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी घ्या!:उष्णतेचा प्रकोप वाढला;‎ तापमान 40 अंशांवर‎, दुपारी 12 ते 3 घराबाहेर जाणे टाळा , प्रशासनाचे आवाहन‎

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ‎ वातावरणाबरोबरच उकाडा प्रचंड‎ वाढला असून, गुरुवारी नगर शहराचे‎ तापमान ४० अशांवर गेले होते.‎ उष्णतेचा प्रकोप वाढल्याने प्रशासनाने‎ अलर्ट जारी केला आहे.

दुपारी १२ ते ३‎ बाहेर जाणे टाळावे असे, आवाहन‎ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र‎ कुमार पाटील यांनी केली आहे.‎

उन्हाचा चटका वाढला

मार्च एप्रिल महिन्यात ढगाळ‎ वातावरणामुळे उन्हाळा जाणवला‎ नाही. मात्र मे महिन्यातील दुसऱ्या‎ आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणू‎ लागले आहेत. बुधवारी शहराचे‎ तापमान ३८ अंश होते. गुरुवारी यात‎ एका अंशांने वाढ होऊन तापमान ४०‎ अंश झाले होते.‎ गुरुवारी दिवसभर शहर व परिसरात‎ उन्हाबरोबर उकडाही जाणवत होता.‎ उष्णतेचा प्रकोप वाढल्याने जिल्हा‎ प्रशासनाच्या आपत्ती विभागाने गुरुवारी‎ अलर्ट जारी केला आहे.

प्रशासनाने‎ उष्मा लाटेपासून बचाव करण्यासाठी‎ पुरेसे पाणी, घराबाहेर पडताना डोके‎ झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा‎ वापर करावा, दुपारी १२ ते ३‎ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.‎

प्रशासनाचे आवाहन

सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी‎ घरातील पडदे व झडपांचा वापर‎ करावा. हलकी, पातळ व सुती कपडे‎ वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी‎ सोबत ठेवावे. जागोजागी पाणपोईची‎ सुविधा करण्यात यावी. अशक्तपणा,‎ डोकेदुखी, सतत येणारा घाम, उन्हाचा‎ झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत‎ व चक्कर येत असल्यास तात्काळ‎ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎