आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसंग्राम संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यासारख्या कार्यक्रमातून महिलांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वास नगरसेविका रूपाली वारे यांनी व्यक्त केला. सावेडी येथे अहमदनगर जिल्हा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने शिवसंग्राम संपर्क कार्यालयात महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना नारिशक्ती सन्मान सोहळ्यातून सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी वारे बोलत होत्या. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील, केशवराव भनगे, त्रिंबक भदगले संदीप खोत, बाबासाहेब नागौडे, शुभम शेटे, शुभम बंग, बाळासाहेब निपुंगे, निवृत्ती निपुंगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी रूपाली वारे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिविंगच्या जयश्री कोल्हे, सुनिता घाडगे, बचत गटाच्या प्रमुख भाग्यश्री नरवडे, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. अर्चना पागिरे, महसूल सर्कल वृक्षाली कोरेशीम, तलाठी सुनंदा आंधळे, सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळापहाड, आशा पटेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सुरेशराव शेटे व त्यांच्या पत्नी पुष्पा शेटे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांचे स्वागत केले. वारे म्हणाल्या,नारी शक्तीचा सन्मान या सोहळ्यात महिलांच्या केलेल्या सन्मानामुळे या महिलांना आणखी बळ मिळेल. अशा कार्यक्रमांमधून महिला शक्तींचा विकास तसेच कुशलता वाढीस लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.